नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वतःच एक Vision Statement बनवलेलं आहे का ? आपल्या आयुष्यातही आपण कुठे जाणार? आपली दूरदृष्टी काय आहे? कुठे आपल्याला पोचायचे आहे ? हे तुम्ही एका सिंगल पेजवर लिहिलेलं आहे का? मित्रांनो Vision Statement अतिशय उपयुक्त आहे कारण तुमच्या आयुष्यातले मोठे मोठे निर्णय घ्यायची जेव्हा वेळ येते त्यावेळी Vision Statement तुम्हाला दिपस्तंभ सारखं मार्गदर्शन करत. मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं सिंगल पेज Vision Statement कसं बनवायचं ते तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपलं सगळ्यांचंच एक Vision Statement असतंच जे स्पष्ट नसेल, लिहिलेलं नसेल पण एक ढोबळ मानाने एक रफ आयडिया असते की, आपल्याला आयुष्यात कुठे पोचायचं आहे, काय मिळवायचं आहे. Vision Statement मध्ये सगळ्यात महत्वाचं कॉन्फयुजन काय असतं की आपण इतरांच्या व्हिजनलाच आपलं व्हिजन बनवतो. कोणी म्हणतो की मला १०० करोडची कंपनी बनवायची आहे तर आपण ते आपलं व्हिजन बनवतो. किंवा सोशल मीडियावर उद्योजक सोबत मोठी गाडी दाखवतात तर आपल्यलाहि तेच वाटत की आपल्यालाही हेच बनायचं आहे. प्रत्येकाचं व्हिजन सारखं नसतं. व्हिजन बाबत बेस्ट गोष्ट हीच आहे की तुम्ही निर्णय घेऊ शकता , की तुमचं व्हिजन काय असाल पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं व्हिजन होत की माझा बांधवाना यातून मुक्त करायचं आहे. त्यांचं व्हिजन जर चांगला वकील बनायचं किंवा खूप पैसे कमवायचं तर त्यांनी कमावले असते कारण ते खूप हुशारही होते. परंतु आज त्यांचं नाव इतक्या वर्षांनंतरही कोणाच्या लक्षात राहील नसतं. किती श्रीमंत माणसांची नावं आपल्या लक्षात आहेत. खूप कमी, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकी. त्यामुळे प्रत्येकाचं वेगळं असतं. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, शिवाजी महाराज इ. च व्हिजन हे वेगवेगळं होत. त्यामुळे दुसऱ्याच्या व्हिजनला आपलं व्हिजन बनवायची चूक मात्र करू नका. तुमचं स्वतःच एक वेगळं व्हिजन असाल पाहिजे. तेव्हाच ते तुम्हाला काहीतरी वेगळं करण्यासाठी उत्तेजित करेल. मित्रांनो मी तुम्हाला आज व्हिजनसाठी ३ प्रश्न सांगणार आहे. मी तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं देणार नाही, कारण मग माझं व्हिजन हे तुमचं व्हिजन होईल. आणि जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरं नीट बनवलेत तर तुम्ही तुमचं Vision Statement चांगल्या प्रकारे बनवू शकता. सर्वप्रथम अशा एका ठिकाणी जा जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. तुमच्या रूममध्ये स्वतःला बंद करून घ्या. थोड्यावेळासाठी किंवा एकटेच फिरायला जा. तुमचा फोन, कॉम्पुटर, टीव्ही, म्युझिक बंद करा. काहीच करू नका फक्त शांतपणे १५ मिनिटे या प्रश्नांचा विचार करा. १५ मिनिटे पेजवर ही काही लिहू नका आणि फक्त विचार करा. आणि त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात करा. तर आता आपण ते ३ प्रश्न बघुयात कोणते आहेत. १. तुम्हाला काय बनायचं आहे? २. तुम्हाला काय करायचं आहे ? ३. तुम्हाला काय मिळवायचं आहे ? आणि या प्रश्नाची उत्तरं फक्त पुढच्या ५ वर्षाचा विचार करून द्या. कारण त्याच्या पुढचं आपल्याला दिसत नाही. जग किंवा तंत्रज्ञान इतकं बदलणार आहे की तुम्ही आता तो निर्णय घेऊ शकत नाही. पुढे काय होणार आहे. पण पुढच्या ५ वर्षाचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. त्यामुळे फक्त ५ वर्षाचा Vision Statement बनवा. आता मित्रांनो, हे ३ प्रश्न आपण आता बघुयात. १. मला काय बनायचं आहे? सर्वप्रथम जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असता. तेव्हा तुमच्या बद्दल काय भावना त्यांच्या मनात अली पाहिजे किंवा तुमच्याबद्दल काय विचार मनात आले पाहिजेत हे लिहा. ते लोक तुमच्याशी बोलून परत जातात तेव्हा त्यांच्या मनात तुमच्याबद्दल काय छवी राहिली पाहिजे ते लिहा. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबा बरोबर तुमची बायको, नवरा किंवा आई-वडील किंवा मुलं त्यांच्यावर तुमचा काय आणि कसा प्रभाव राहिला पाहिजे ते लिहा. त्याचप्रमाणे तुमचे मित्र मंडळी, तुमचा समाज, तुमच्या आसपासची लोकं यांनी काय आणि कसा विचार केला पाहिजे ते तुम्ही लिहा. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला काय वाटतं ते नाही लिहायचं तर दुसर्यांना तुमच्याबद्दल काय वाटलं पाहिजे ते लिहायचं आहे. २. तुम्हाला काय करायचं आहे ? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला तुमच्या करिअर बद्दल लिहायचं आहे. तुम्हाला तुमचं करिअर आहे तेच ठेवायचं आहे की बदलायचं आहे. किंवा ते ५ वर्षात कधी बदलणार आणि ते बदलण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल ते लिहा. त्यानंतर तुम्ही आता कोणत्या लेवलवर आहात. समजा तुम्हाला हेच करिअर पुढे घेऊन जायचं आहे तर आता तुम्ही कोणत्या लेवलवर आहात आणि ५ वर्षानंतर तुम्ही कुठल्या लेवलवर पोहोचायचे आहे. तुम्ही लिहू शकता की तुम्हाला कंपनीचा CEO बनायचं आहे पण ते या पुढील ५ वर्षात होणं शक्य आहे का ? तुम्ही आता कोणत्या लेवलवर आहात आणि जर ते ५ वर्षात शक्य नसेल तर ते नका लिहू. तर CEO बनणं हे स्वप्न झालं आणि जनरल मॅनेजर बनणं हे व्हिजन झालं. त्यामुळे तुम्हाला स्वप्नांपासून मार्ग मिळत नाही तर व्हिजन पासून मिळतो. स्वप्न डिस्ट्रक्ट करतो तर व्हिजन तुम्हाला मार्ग दाखवतो. त्यासोबत तुम्ही लिहा की तुम्हाला तुमचा वेळ कसा घालवायचा आहे. तुम्ही काय शिकणार आहात. काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकयच्या आहेत का? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे का ? किंवा कोणता देश पाहायचा आहे का ? तुम्हाला फक्त काम काम नाही करायचं , फक्त पैसा पैसा नाही करायचं तुम्हाला फक्त करिअरचं नाही करायचं. तुमहाला तुमचं आयुष्य पण आहे आणि ते तुम्हाला जगायचं सुद्धा आहे. ३. तुम्हाला काय मिळवायचे आहे ? त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे मला काय मिळवायचं आहे. यात तुम्ही फिजिकल किंवा भौतिक गोष्टी लिहू शकता. जस की, घर कोणतं घ्यायचं आहे, 1BHK , 2BHK , बंगला, गाडी , जमीन, कार, इ. घ्यायचे का? एक Crystalclear Image त्याबद्दल लिहा. त्यानंतर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप बद्दल लिहा. तुमहाला काय अपेक्षा आहेत? तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहा. लग्न करायचं आहे की नाही? बायको किंवा नवऱ्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे ते लिहा. अशाप्रकारे या ३ प्रश्नाची उत्तरे शांतपणे विचार करून लिहा. आणि ती उत्तरं लिहिल्यानंतर एकाच पेजवर लिहा. एका पानावर ३ कॉलम करा, काय मिळवायचं, काय करायचं आणि काय बनायचं. या ३ गोष्टी जर तुम्ही लिहिल्यात तर ते तुमचं डॉक्युमेंट तुमचं Vision Statement तयार होईल. ते तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला नेहमी मदत करेल. तुम्ही जे काही लिहिलं आहे ते तुम्हाला रिव्युव्ह करायचे आहे, ३ किंवा ६ महिन्यांनी किंवा १ वर्षाने. आणि तुम्ही त्याच्यात थोडे थोडे बदल करू शकता. मी तुम्हाला एक माझंच उदाहरण सांगतो, माझ्या Vision Statement मध्ये माझं कुटुंब हे सगळ्यात पहिले आहे. आणि नंतर बिझनेस आहे. पैसा नंतर आहे. हे मी Vision Statement मध्ये लिहिल्यामुळे मला ज्या काही चांगल्या ऑर्डर्स येतात ज्या मुंबई, पुणे किंवा नाशिक पासून लांब आहेत जिथे मला खूप प्रवास करावा लागतो, लांब राहावं लागतं, त्यामुळे मी अश्या ठिकाणच्या ऑफर्स घेतच नाही. कारण मला माझं कुटुंब सगळ्यात पाहिलं आहे. मला त्यांच्यापासून लांब राहायचं नाहीये. तर मित्रांनो मला ही कॅलॅरिटी मला Vision Statement मधून आली. अशाप्रकारे तुमच्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि नेहमीच मोटीव्हेट करेल. आणि आता व्हिजन म्हणजे तुमच्या दृष्टीला आता ते दिसायला लागलं आहे तेव्हा तुमच्या आत असलेल्या मोटिव्हेशनच्या टाळ्याला एक छवी मिळते आणि ते कुलूप उघडलं जात. आणि मग या व्हिजन डॉक्युमेंट मुळे तुम्हाला जरी कधी स्टेजवर उभं राहून जोरात बोलणाऱ्या मोटिव्हेशनची गरज नाही तुम्हाला ते तुमच्या आतून मिळतं. मला खात्री आहे की तुम्हाला हा छोटासा व्हिडीओ नक्की आवडला असेल. धन्यवाद ! अॅपल ने काल शेअर मार्केट मध्ये १ ट्रीलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला. या टप्प्यावर असलेली ती जगातील एकमेव कंपनी बनली आहे.
४२ वर्षांपूर्वी एका गॅरेज मध्ये सुरु झालेली कंपनी आज जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ही निश्चीतच उदयोन्मुख नवउद्योजकांसाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. पण मित्रांनो, अॅपल इथे पोहोचू शकलं याचं एकमेव कारण आहे "फोकस" . होय फोकस. - पण स्टीव्ह जॉब्सच्या मते फोकस म्हणजे एकाच अतिमहत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे असे नव्हते तर त्यासोबत इतर १००० गोष्टींना "नाही" म्हणणे हे देखिल त्याला अभिप्रेत होते. हजारो चांगल्या कल्पना समोर येतात त्यापैकी ९९९ कल्पनांना नाही म्हणून उरलेल्या एकावर काम करणे याला स्टीव्ह जॉब्स फोकस करणे असे म्हणत असे. १९९७ साली वायर्ड मासिकाच्या कव्हर वर "अॅपल" कंपनी संपायला आली आहे आणि तिच्यासाठी "प्रे" (प्रार्थना) करा अशा आशयाचं चित्र छापून आलं होतं. ईतकी अॅपलची वाईट अवस्था झाली होती. स्टीव्ह जॉब्स तेव्हा अॅपल मध्ये नव्हता. नंतर त्याला जेव्हा पुन्हा हंगामी सीईओ (Interim CEO म्हणजेच iCEO, यावरुनच पुढे त्याने कंप्युटरला iMac असे नाव दिले. !) म्हणून पुन्हा बोलावण्यात आलं तेव्हा त्याला आढळलं की अॅपल मध्ये अनेक वेगवेगळी उत्पादनं डीझाईन करणारे प्रोजेक्ट्स चालू आहेत. सर्वप्रथम त्याने फक्त २ प्रोजेक्ट्स चालू ठेवले आणि बाकी सर्वच्या सर्व प्रोजेक्ट्स बंद केले. कंपनीचं पुर्ण लक्ष, मॅनपॉवर, पैसा केवळ दोनच प्रोजेक्ट्सवर फोकस केला. आणि त्यातूनच पुढे अॅपलने प्रगती केली. कारण स्टीव्हच्या मते अॅपल प्रॉडक्ट्स निवडताना ग्राहकांच्या मनात गोंधळ होत होता. नक्की कोणतं प्रॉडक्ट माझ्यासाठी आहे हे ग्राहकाला ठरवता येत नव्हतं. केवळ एकच पण बेस्ट प्रॉडक्ट आम्ही ग्राहकांना देणार हा संदेश स्टीव्ह जॉब्स ने ग्राहकांना दिला आणि तेच अॅपलच्या यशाचं कारण ठरलं. पुढे गुगलच्या लॅरी आणि सर्गी बरोबर चर्चा करत असताना स्टीव्ह ने हाच सल्ला त्यालाही दिला. गुगलने तेव्हा मुनशॉट्स म्हणजे भविष्यात मोठे होतील पण आता त्याची कल्पनाही करता येणार नाही अशा अनेक बिझनेसेस मध्ये काम करायला सुरुवात केली होती. स्टीव्हच्या या सल्ल्यानंतर अनेक मुनशॉट्स बिझनेस मधून गुगलने काढता पाय घेतला होता. त्यातूनच पुढे अल्फाबेट ही स्वतंत्र कंपनी स्थापन करुन लॅरी आणि सर्गी भविष्यातील बिझनेसेस वर फोकस करु लागले आणि गुगलला वेगळे ठेवून "सुंदर पिचाई"ला गुगल च्या उत्पादने आणि सेवांवर फोकस करायला सांगितले. आजही जर आपण बघितलंत आयफोनचं एका वेळी केवळ एकच मॉडेल अधिकृतरित्या बाजारात उपलब्ध करुन दिलं जातं. (आपफोन एक्स चा अपवाद वगळता). आणि त्यामुळे ग्राहकांच्या मनात कुठल्याही प्रकारचा गोंधळ नसतो आणि आयफोनच सगळ्यात चांगला पर्याय आहे हे त्यांच्या मनात ठसते. मी बर्याच व्यावसियाकांना भेटतो तेव्हा जवळपास प्रत्येकजण मला व्यवसाय वाढविण्यासाठी मी नविन प्रॉडक्ट्स बाजारात आणतोय, नविन ठिकाणी शाखा उघडतोय किंवा अगदी नवे बिझनेस सुरु करतोय असं सांगत असतात. त्यावेळी त्यांचा "फोकस" कमी होतोय हे मला जाणवत असतं आणि मी प्रकर्षाने त्यांना ते तितक्याच कळकळीने सांगतही असतो. अर्थात बिझनेस वाढवू नये असं नाही. पण बर्याचदा नव्या प्रॉडक्ट्स किंवा बिझनेसेस साठी वेळेची, माणसांची आणि पैशांची मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते आणि सध्या चालू असलेल्या पहिल्या बिझनेसवर याचा ताण पडू लागतो. शेवटी एक गुटगुटीत बाळ होण्याऐवजी दोन कृष बाळं तयार होतात. तेव्हा अॅपल कडून आपण हे शिकूया आणि जास्तीत जास्त फोकस आपल्या मुख्य बिझनेसकडेच ठेवूया. पुढची ट्रीलीयन डॉलर कंपनी बनवायची असेल तर तिथे पोहोचवायला हेच वाहन उपयोगी ठरणार हे नक्की ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया ! WWW.NETBHET.COM नमस्कार मित्रांनो, हा जमाना डिजिटलचा आहे, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि इंटरनेट आहे. मोबाईल अधाशासारखा वेगवेगळ्या जुन्या क्षेत्रांना खाऊन टाकतोय. संगीत क्षेत्रही मोबाईल आणि इंटरनेटच्या वापरामुळे डबघाईला गेलय. कॅस्सेट्स आणि सीडी विकून एकेकाळी बक्कळ कमाई करणाऱ्या म्युझिक कंपन्यांची युट्युब, gaana.com, सावन सारख्या म्युझिक ॲप्स मुळे घुसमट होत आहे. पण मित्रांनो भारतातल्या एका जुन्या म्युझिक कंपनीने या कठीण काळातही स्वतःसाठी एक नवीन मार्केट शोधलं आणि इनोव्हेशन करून अभूतपूर्व यश मिळवलं. मित्रांनो, या कंपनीचं नाव आहे सारेगामा आणि त्यांच्या नवीन प्रॉडक्टच नाव आहे कारवा, सारेगामा च कारवा हे उत्पादन म्हणजे नवीन आणि जुन्या चा अनोखा संगम आहे. करावा हा ऑटो डिजिटल आडियो प्लेयर आहे, आतून डिजिटल असला तरी बाहेरुन तो जुन्या रेडिओ सारखाच दिसतो. हा नुसता म्युझिक प्लेअर नाही तर यामध्ये 5000 जुनी गाणी सुद्धा देण्यात आलेले आहेत. ही गाणी कलाकार आणि गाण्याच्या मोड्सप्रमाणे ऐकता येतात तसेच यामध्ये अमीन सयानी यांच्या गाजलेल्या गितमाला कार्यक्रमाचे सर्व भाग देण्यात आलेले आहेत आणि त्यासोबत एफएम रेडिओ, यूएसबी, ब्लूटूथ म्युझिकचा पण पर्याय देण्यात आलेला आहे. गेल्यावर्षी मे 2017 ला सारेगामा कारवा बाजारात आले, तेव्हा असे उत्पादन आजच्या जगात चालेल का? हा प्रश्न सर्वांच्याच तोंडावर होता. सहा हजार रुपये किंमत असलेल्या कारवा चे पहिल्या वर्षात एक लाख पिसेस विकण्याचे कंपनीचे लक्ष होते. प्रत्यक्षात मात्र सारेगामा ने पहिल्याच वर्षी 360000 पिसेस विकले म्हणजेच साधारण 216 करोडचा बिझनेस फक्त एकट्या कारवा या म्युझिक प्लेअर केला. जुनी गाणी ऐकवून ग्राहकांना गतकाळातल्या जून्या आठवणीत घेऊन जाणारं आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या रेडिओ सारखा दिसणारा हे उपकरण एवढं चालतंय की मार्केटिंग च्या इतिहासात याचं नाव नक्कीच सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. सारेगामा ने प्रॉडक्ट नक्की कस बनवलं आणि कारवाच्या यशामागे काय स्ट्रॅटेजी होत्या ते आपण यामध्ये बघणार आहोत. बाजाराचा अभ्यास : विक्रम मेहरा यांनी 2015 मध्ये सारेगामा चे एमडी म्हणून काम सुरू केलं तेव्हाची गोष्ट. सारेगामा हा ब्रँड तरुणाईला भावेल यासाठी नवीन काहीतरी करण्याचे कंपनीने ठरवले. त्यासाठी काय काय करता येईल हे पाहण्यासाठी विक्रम मेहरा यांनी द वॉर्म या एजेन्सी सोबत मार्केट रिसर्च हाती घेतली. या रिसर्चच्या संधर्भात कानपूर येथे गेले असताना त्यांना एका वयस्कर बाईने सांगितलं कि बेटा विविध भरती चे जुने दिवस फार छान होते, पुढे कोणत गाणं लागणार आहे ते माहित असायचं त्यामुळे प्रत्येक गाणं ऐकायला एक वेगळाच आनंद असायचा. आता मात्र टेकनॉलॉजीमुळे सगळंच मिरज झालंय. तेव्हा विक्रम मेहरा यांच्या लक्षात आलं की, कॅस्सेट आणि सीडी शी जुळून घेतलेल्या एका जुन्या पिढीचा संगीतातील नातं तुटलंय, कारण स्मार्टफोन आणि म्युझिक अँप्स काही त्यांना जमत नाहीत. या एका इन्साईटवरून त्यांनी तरुणाईचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवला आणि चाळीस वर्ष आणि अधिक वय असणाऱ्या सेगमेंटवर फोकस करायला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा नव्याने मार्केट रिसर्च करून आणि नंतर अनेक मिटींग्स नंतर कारवा हे प्रॉडक्ट आकार घेऊ लागलं. उत्पादनाची घडण : कारवा हे जुन्या ट्रांझिस्टर रेडियो सारखा दिसणारा उपकरण असेल हे ठरलं. तसेच गाणी गायकांचे नावानुसार मांडावित हे ही ठरवलं. विक्रम मेहरा त्यांच्या जुन्या बॉसच्या एका पार्टी मध्ये गेले होते, तिथे त्यांच्या बॉसने सांगितलं की एफएम रेडिओ पण ॲड करा, कारण रेडिओ ऐकला सगळ्यांना आवडतं पण कार शिवाय इतर ठिकाणी गाणी ऐकताच येत नाही, गाणी नेमकी किती आणि कोणती असावीत याबाबत तर फारच चर्चा झाली, सारेगामा च्या एवढ्या वर्षांच्या गाण्यांचा डेटाबेसचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि वेब डेटा वापरून अनालिसिस करण्यात आला आणि मग ५००० गाणी ठरवण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रसिद्ध अमीन सयानी यांच्या गीतमाला या कार्यक्रमाचे भाग ऍड करण्याचा सल्ला विक्रम यांच्या वडिलांनीच दिला. त्यांनी सांगितलं की, किशोर कुमार वगैरे ठीक आहे पण आमच्या काळात खरे सुपस्टार अमीन सयानी हेच होते. गीतमाला चे सर्व अधिकार सारेगामा कडे आधीपासूनच होते त्यामुळे ते ऍड करण देखील सोपं होत. अमीन सयानी यांचा नुसता आवाज जरी ऐकला तरी जुनी लोक भारावून जातात. आता हे उपकरण अतिशय सोप असावं म्हणून मुद्दाम त्यात कमीत कमी बटन दिले आहेत. टच स्क्रीन न देता जुनी रेडिओ सारखी गोल बटने देण्यात आलेली आहेत. करावा उपकरण जरी वयस्कर लोकांसाठी होतं तरी ते स्वतःहून खरेदी करणार नाहीत हे सारेगामाच्या टीमला देखील माहीत होतं म्हणून तरुणांना देखील भावतील असे ब्लूटूथ, यूएसबी असे फीचर्स देखील यामध्ये दिलेले आहेत. पण हे फीचर्स कारवाच्या उजव्या बाजूला दिलेले आहेत. समोरून ते दिसणार नाहीत या खुबीने ते लपवले गेले आहेत. विपणन आणि वाटप : कारवा उपकरण कितपत चालेल याचे अनुमान करता येणं कठीण होतं, म्हणून सारेगामा ने सुरुवातीला मार्केटिंग वर खर्च न करण्याच ठरवलं. सारेगामा च युट्युब चॅनेल चांगला चालू होता, त्यामध्ये व्हिडिओ दरम्यान त्यांनी आपल्या जाहिरातीत आपली सुरुवात केली आणि काही रेडिओ ऍड केल्या. पहिले वर्षभर म्हणजे साडेतीन लाख उपकरणांची विक्री करेपर्यंत कारवा ची टीव्ही जाहिरात बनवली गेली नव्हती, त्यानंतर मे 2018 मध्ये सारेगामा ने पहिल्यांदा कारवासाठी टीव्ही ऍड चालू केली. असं म्हणतात की, एखादं गाणं आपल्याला आवडतं कारण त्या आपल्या सोबत घडलेल्या एखाद्या घटने सोबत किंवा भावने सोबत जोडलं गेलेलं असतं, असं गाणं ऐकताना मन आपोआप आठवणीत रमतो आणि गतकाळाची हुरहुर लागते. बरोबर हीच थीम सारेगामा कारवाच्या मार्केटिंग मध्ये वापरण्यात आली आहे. हे प्रॉडक्ट पाहताना, वापरताना आणि ऐकताना जुन्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अगदी करावामध्ये वापरण्यात आलेले स्पीकर्स पण आधुनिक काळातले सुस्पष्ट आवाज देणारे वापरलेले नाहीत. जुन्या रेडिओचे असायचे त्यापेक्षा थोडे चांगले स्पीकर्स वापरण्यात आले आहेत.एवढा बारीक सारीक विचार या प्रॉडक्ट डेव्हलोपमेंट मध्ये करण्यात आला होता. कारवा ची पोझिशनिंग एक भेटवस्तू अशी करण्यात आली. आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना भेट देण्यासाठी एक उत्तम उपाय अशी मार्केटिंग तरुणांना टार्गेट करून करण्यात आली. त्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. यासाठी सारेगामा ने बनवलेली ऍड तर अप्रतिम आहे. पाच मिनिटांची ही ऍड बघितलीत तर कारवा विकत घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. कॉपी राईटमुळे मी येथेही जाहिरात दाखवत नाही पण खालील लिंक देतो आहे, ती जाहिरात अवश्य बघा. कॅस्सेट्स आणि सीडीचा जमाना गेल्यापासून सारेगामा चा रिटेल मार्केट आणि डिस्ट्रिब्युशनशी संबंध तुटला होता, कारवा लाँच करण्याआधी वर्षभर पडद्यामागे डिस्ट्रिब्युशन सुधारण्यासाठी काम सुरू होते. चार हजार दुकानांमध्ये हे उत्पादन पोहोचवले गेले. तरुणांना विकत घेण्यासाठी ऑनलाइन आणि इतरांना विकत घेता यावे यासाठी ऑफलाईन अशी दोन्हीकडे रिटेल स्ट्रॅटेजी काम करत होती. केवळ एका वर्षातच 200 करोडचा पल्ला गाठणारे हे उत्पादन मार्केटिंगचा इतिहासातील एक जबरदस्त केसस्टडी ठरले आहे. सारेगामाने आपल्याकडे आधीपासूनच असलेल्या गाण्यांना नव्या प्रकारे विकले त्यामुळे त्यांची कॉस्ट खूपच कमी झाली आणि जास्तीत जास्त चांगला फायदा त्यांना यामधून मिळवता आला. एवढ्यावरच न थांबता आता एक्सपोर्टसाठी आणि प्रादेशिक भाषा यांवर फोकस करून कारवा चे नवीन प्रकार बाजारात आणण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे. सारेगामा कारवा अशाप्रकारे अतिशय विचारपूर्वक बनवले गेलेले ग्राहकांची लपलेली भावनिक गरज ओळखून बनवले गेलेले, कमी खर्चात बनवले गेलेले आणि अतिशय कमी मार्केटिंग करून बाजारात आणलेले उपकरण आहे. मराठी उद्योजकांना यातून काय शिकता येईल ? मित्रानों सारेगामा च्या केस स्टडी म्हणून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, सगळ्यात पाहिलं म्हणजे ग्राहकांची योग्य गरज ओळखणे. त्यासाठी मार्केट रिसर्च महत्त्वाचे आहे, दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट सेगमेंटेशन. सगळ्यांनाच सगळं काही विकता येत नाही, तेव्हा आपला ग्राहक वर्ग नीट ओळखून त्यांच्यासाठी उत्पादन बनवण्यात जास्त गरजेचा आहे. ग्राहकांची भावनिक गरज ओळखून इमोशनल मार्केटिंग करणे आणि प्रॉडक्ट इतकं चांगलं बनवणं की ते स्वतः स्वतःची जाहिरात करेल असे काही महत्वाचे धडे आपल्याला सारेगामा कारवा या केस स्टडी मधून नक्कीच शिकता येतील. मित्रांनो मला खात्री आहे सारेगामा कारवाची ही युनिक केसस्टडी तुम्हाला नक्की आवडली असेल आणि यातून तुमचा उद्योग पुढे नेण्यासाठी तुम्हाला बऱ्याच कल्पना देखील सुचल्या असतील. मित्रांनो, भारतामधील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड कोणता असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर कदाचित तुमचे उत्तर Samsung असे असेल. पण नुकताच Xiaomi या कंपनीने हा बहुमान पटकावला आहे. मित्रांनो Xiaomi या केवळ ४ वर्षांपूर्वी भारतात आलेल्या कंपनीने Samsung आणि Apple सारख्या बलाढ्य कंपन्यांना मागे टाकण्याचा पराक्रम करून दाखविला. ही आश्चर्याची बाब आहे. फक्त ४ वर्षात Xiaomi ने हे यश कसे मिळविले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. Xiaomi या कंपनीची सुरुवात एप्रिल २०१० मध्ये चीन मध्ये झाली. "ली ज्यून" यांनी इतर सात लोकांबरोबर या कंपनीची सुरुवात केली. खरंतर Xiaomi ही एक इंटरनेट कंपनी आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असलेले MiUi हे फोनचे सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यासाठी फोन रूट करणे गरजेचे होते त्यामुळे बरेच जण इच्छा असूनही MiUi वापरू शकत नव्हते. म्हणून Xiaomi ने MiUi आधीपासूनच असलेले फोन बाजारात लाँच केले. केवळ ३ वर्षातच Xiaomi भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड बानू शकली यामागे Xiaomi च्या बऱ्याच स्ट्रॅटेजिज आहेत. चला तर मग बघूया काय आहेत Xiaomi ला यशस्वी बनविणाऱ्या स्ट्रॅटेजिज. |