मित्रांनो , पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेला "Make in India" हा महत्वाकांक्षी उपक्रम सध्या बराच चर्चेत आहे. पण तरीही अजूनही बरेच जण या उपक्रमाबाबत अनभिन्न आहेत. अशा सर्वांसाठी मी एक छोटासा केवळ ३ मिनिटांचा व्हीडीओ बनविला आहे. मेक ईन इंडीया (Make in India) म्हणजे नक्की काय ? मेक ईन इंडीया कशासाठी ? नागरीकांना आणि देशाला या उपक्रमाचा काय फायदा ? हे थोडक्यात समजावून सांगणारा हा व्हीडीओ तुम्हाला नक्की आवडेल ! " एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ " याचे उत्तम उदाहरण म्हणजे निखिल दुगल आणि अक्षय गोयल यांचा "आदान" हा नवउद्योग ! आपल्या व्यवहारिक जिवनात ' टाकाऊपासुन टिकाऊ ' या तत्वाचा वापर करुन उद्योगाच्या जगतात क्रान्ति घड्विण्याचा उपक्रम य जोडिने केला. घरबांधणी हा मानवी इतिहासाचा ए़़क भाग असुन गेल्या काही द्शकापासुन सिमेंट हा बांधकाम निर्मितीचे एक प्रमुख स्त्रोत म्ह्णुन सर्वानाच परिचित आहे.परंतु या ग्रुहनिर्मितिला एक नवे रुप देण्याचा प्रयत्न करुन या उद्योगात या दोघांनीही पहिले पाऊल टाकले. 'आदान' या त्यांच्या उपक्रमात जुने shipping container चा वापर करुन योग्य असे eco friendly infrastructure बनविणयाच्या त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. वेगळे काहीतरी करण्याच्या विचाराने दोघांनी सामाजिक उद्योगाच्या माध्यमातुन सन २०१५ मध्ये कंपंनीची स्थापना केली. दिल्ली येथे एक योग्य जागा शोधुन त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. परीपुर्ण सुविधांसह, उत्तम तन्त्रज्ञानाचा वापर करुन container द्वारे ग्रुहनिर्मिति करुन ती योग्य जागेवर पोचविण्याची जवाबदारी त्यांनी स्विकारली. कठिण परिश्रम करुन अनेक ठिकाणी उत्तम डिजाइनर कन्टेनर त्यांनी निर्माण केले. मानवी वस्तीपासुन दुर तसेच कोणत्याही सुविधा नसलेल्या जागी , जेथे सिमेंटचे बांधकाम करणे कठीण आणि खर्चिक ठरते अशा ठिकाणी ही कंटेनर रुपी घरे पोहचविणे हा त्यांच मुळ उद्देश्य होता. आज वेगवेगळ्या क्षेत्रात मग ते उद्योग-वसाहति असोत,रेस्टोरंट असोत, NGO/CSR चे ईव्हेंट्स असोत त्यांच्या ह्या डिजाइनर कंटेनरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे कंटेनर्स वापरुन दुकाने, लायब्ररी, घरे इत्यादी वास्तु बनविता येतात. एवढेच नव्हे मोठ्या ट्रक्सवर अशा वास्तु स्थापीत करुन त्यांना "फिरते" स्वरुपही देता येते. म्हणजे कुठेही जागा भाड्याने घ्यायची आणि तिथे आपलं हे घर घेऊन जायचं. इतकं सोपं.
कंटेनर पासून बनलेली घरं स्वस्त असतात, त्यांची वाहतूक करता येते आणि घरे बनविण्यास जास्त वेळ देखिल लागत नाही. इतकच नव्हे तर "आधन"ने घरांवर सौर उर्जा संच देऊन संपुर्ण घर बाहेरुन विज न घेता देखिल वापरता येतील अशी बनविली आहेत. आणि सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे अशी "कंटेनररुपी" घरे वापरल्याने घर बांधणीत होणारा पर्यावरणाचा र्हास देखिल थांबवता येतो. सध्या त्यांच्या या व्यवसायाचे ऑनलाइन तसेच ऑफलाइन मार्केटिंग चालु आहे. त्यांच्या या व्यवसायाची NDTV वरील Real Deal ह्या कार्यक्रमाने दखल घेतली. त्यानंतर त्यांच्या व्यवसायाची चांगलीच मार्केटिग झाली. आज त्यांच्या या डिजाइनर कंटेनरला सर्वात जास्त मागणी NGO मधुन येत आहे. सध्या त्यांचे प्रकल्प मुंबई,तमिळ्नाडु,छत्तिसगड्,नोइडा व इतर अनेक ठिकाणी चालु आहे. त्यांचे लक्ष्य Eco-friendiy rental store आणि High-end toilet ची निर्मीती आहे.जेणेकरुन कोणत्याही इवेंट्च्या ठिकाणी ते भाड्याने देउन व्यवसायात भर पडू श़़कते. आज सामाजिक उद्योगात 'आदान'ने एक महत्त्वाची भूमिका बजवली आहे. मोठ्यात मोठा व्यवसाय फ्क्त जास्त पैशाने नव्हे तर चांगल्या, अभिनव कल्पनेने मोठा होतो हे त्यांनी दाखवुन दिले. जेव्हा सगळ्यांसाठी अशक्य असते तेव्हाच काहितरी करुन दाखविण्याची संधी शोधतात तेच खरे उद्योजक्. कंटेनद्वारा ग्रुहनिर्माणाच्या ह्या नवीन संकल्पनेने मानवी जीवनाला पुर्णपणे नवे रुप देण्याचा त्यांचा प्रयन्त खरोखरच उल्लेखनीय आहे . http://www.aadhan.org/ धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com मित्रांनो, तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोन मध्ये एक अद्भुत सुविधा गुगलने दिलेली आहे. पण बर्याच जणांना त्याच्याबद्दल माहिती नसते किंवा माहिती असली तरी हे फीचर वापरायचे कसे ते महिती नसते. या सुविधेचं नाव आहे, गुगल वॉईस सर्च. याच सुविधेला गुगलने "ओके, गुगल" या पर्सनल असिस्टंट प्रोग्राममध्ये समाविष्ट केले आहे. गुगलने Artificial Intelligence आणि Machine Learning क्षेत्रामध्ये खुप प्रगती केली आहे आणि "ओके गुगल" त्याचाच एक छोटासा भाग आहे. ओके गुगल एक अतिशय मजेशीर आणि उपयुक्त सेवा आहे. ओके गुगल वापरुन आपण मोबाईल सोबत बोलु शकतो, मोबाईलला आपल्या आवाजाच्या सहाय्याने ऑर्डर्स देउ शकतो. ओके गुगल वापरण्याचे खुप सारे फायदे आहेत. असे हे "ओके गुगल" म्हणजे काय आहे, ते कसे वापरायचे हे समजावून देणारा हा व्हीडीओ मी खास नेटभेटच्या वाचकांसाठी बनवला आहे. तो जरुर पहा आणि व्हीडीओ कसा वाटला ते मला खाली कमेंटस मध्ये जरुर लिहुन कळवा. धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com मित्रांनो, हा फोटो आहे उबरच्या (UBER) नव्या स्वयंचलित कारचा. नुकताच त्यांनी या कारचे पहिले मॉडेल लोकांसमोर आणले.
सहा वर्षांपुर्वी जी "उबर" ही कंपनी अस्तीत्वातच नव्हती, त्या कंपनीने एवढी मोठी उडी घेणे ही बिझनेस जगातील एक परीकथाच म्हणावी लागेल. २०१० मध्ये उबरने पहिल्यांदा टॅक्सी बुकींगचं अॅप सुरु केलं आणि आज उबर ६० देशांमधील ४०० शहरांमध्ये ५,००,००० टॅक्सीचालकांसोबत व्यवसाय करत आहे. आणि दर सहा महिन्यांनी हे आकडे दुप्पट होत आहेत. लवकरच तो दिवस येईल जेव्हा "उबर"ला नविन टॅक्सी आणि चालकांची आवश्यकता भासणार नाही. वर्षानुवर्षे अजिबात न बदललेल्या टॅक्सी वाहतूकीच्या क्षेत्रात उबरने आपल्या नव्या बिझनेस मॉडेलने अमुलाग्र बदल करुन टाकला. कोणत्याही स्थिरस्थावर उद्योगक्षेत्रामध्ये अगदी ३६० अंशाने अमुलाग्र बदल करणे याला "डीसरप्शन" असा एक अतिशय छान इंग्रजी शब्द आहे. तर उबरने टॅक्सी वाहतूकीच्या क्षेत्रात असेच डीसरप्शन केले, पण उबरला हे देखिल माहित आहे की उद्या कोणीतरी उबरचे हे बिझनेस मॉडेल देखिल डीसरप्ट करु शकेल. आणि दुसर्या कोणीतरी स्पर्धकाने उबरला बदलणे भाग पाडण्याच्या ऐवजी उबरने स्वतःच स्वतःचे बिझनेस मॉडेल डीसरप्ट करायचे ठरवले आहे. “You either disrupt your own company or someone else will.” ~ Peter Diamandis आणि म्हणूनच उबरने नुकताच ही नवी स्वयंचलीत कार जगासमोर सादर करताना सांगीतले की, "स्वयंचलीत कार्स हेच वाहतूकीचे भविष्य असणार आहे. जगभरात दरवर्षी सुमारे १३ लाख लोक रस्त्यांवरील अपघातात मरण पावतात. आणि यापैकी ९४% अपघात हे चालकाच्या चुकीमुळे होतात. स्वयंचलित कार मुळे या मानवी चुका टळतील आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होतील. स्वयंचलित गाड्यांमुळे ट्रॅफीक जॅम कमी होतील, इंधन बचत होईल, वाहतूक स्वस्त होईल आणि अपघातही कमी होतील. वाहतूक नळातून वाहत्या पाण्याईतकी सोपी आणि सहज करणं हे आमचं (उबरचं) ध्येय आहे आणि स्वयंचलित गाड्याच आम्हाला ते ध्येय पुर्ण करायला मदत करतील." पण याचा अर्थ साहजिकच हा आहे की जगभरात जे ५,००,००० चालक आज उबरमुळे व्यवसाय करत आहेत. ते उद्या बेरोजगार होतील. उबर सुरु झाल्यानंतर साध्या टॅक्सी ड्रायवर्सने रस्त्यावर उतरुन उबरचा निषेध केला होता. असाच विरोध आता उबरचे चालक करतील. पण हा बदल अपरीहार्य आहे. उबरने त्यांच काम हिरावून घेतलं नसून तंत्रज्ञानाने हिरावून घेतलं आहे. या येऊ घातलेल्या "डीसरप्शन"ने हिरावून घेतलं आहे. जर उद्याची दिशा ओळखून उबरने आजच पाउले उचलली नाहीत तर त्यांचा टीकाव लागणं अशक्य आहे आणि म्हणूनच आज अतिशय चांगला चाललेला व्यवसाय मुळापासून बदलून टाकण्याची त्यांची तयारी आहे. मित्रांनो, उद्योजकांनो, व्यावसायीकांनो, कर्मचार्यांनो अतिशय वेगाने येणार्या या अशा बदलांना सामोरे जाण्यासाठी आपण काय पाउले उचलत आहोत. आपल्या कामात, व्यवसायात येत्या ३-५ वर्षात जे बदल होणार आहेत त्याची चाहुल आपण घेतली आहे का ? उदाहरणार्थ येत्या काही वर्षात स्वयंचलित कार सर्वत्र झाल्यानंतर "मोटर ट्रेनिंग" हे क्षेत्र जवळपास संपणार आहे. भविष्यातील गाड्या सौरऊर्जेवर चालणार्या आहेत त्यामुळे पेट्रोल, डीझेल क्षेत्राला एक प्रचंड मोठा धोका आहे. डेस्कटॉप आणि लॅपटॉपचा वापर कमी होऊ लागला आहे त्यामुळे डेस्कटॉप , लॅपटॉप रीपेअरींग, असेम्ब्ली इत्यादी क्षेत्रं येत्या ५-१० वर्षात पडद्याआड गेली तर नवल वाटणार नाही. मित्रहो, बदल थांबवता येत नाही मात्र त्याची पावलं ओळखून तयारी करणं हे आपल्या हातात आहे. जे उद्या नाईलाजाने करावच लागणार आहे ते आजपासूनच केलं तर बरं ! नाही का ? धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेत जगण्याचा एक मुख्य फायदा आहे. आपण गरीब रहावं, मध्यमवर्गीय असावं की श्रीमंत व्हावं हे निवडण्याची संधी आपल्याला आजचं जग देतय. पण तरीही आपल्यापैकी बरेच जण गरीब किंवा मध्यमवर्गीयच राहिले आहेत. प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते हे आपलं नशीब नसून ही आपली चॉईस आहे. रॉबर्ट कियोसाकी यांची "रिच डॅड , पुअर डॅड" आणि " कॅशफ्लो क्वॉड्रंट" ही अर्थिक नियोजनावर भाष्य करणारी दोन पुस्तके तुफान गाजली. यातील " कॅशफ्लो क्वॉड्रंट" या पुस्तकांमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्यापैकी बरेचजण गरीब किंवा मध्यमवर्गीय का रहिले आहेत याचा उहापोह केला आहे. त्यांचा हा विचार "" कॅशफ्लो क्वॉड्रंट" या नावाने जगभर प्रसिद्ध आहे. मित्रांनो मी आज या व्हीडीओमध्ये "कॅशफ्लो क्वॉड्रंट" सोप्या मराठीत समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com ऑनलाईन बिझनेस मध्ये अॅनॅलीटीक्सला प्रचंड महत्त्व आहे. आपल्या वेबसाईटमध्ये किंवा अॅपमध्ये आलेले ग्राहक नेमके कसे वागतात ? कुठे क्लिक करतात ? कोणत्या पानावर किती वेळ घालवतात ? पहिल्या पानानंतर कुठे जातात ? किती वेळाने जातात ? कोणते प्रॉडक्ट्स पाहतात? कोणत्या लिंकवर क्लिक करतात ? असे एक ना अनेक गोष्टी सतत तपासल्या जातात आणि त्यानुसार वेबसाईट मध्ये किंवा अप्लिकेशनमध्ये बदल केले जातात. असा बारीक सारीक डेटा नीट तपासून त्यातून बिझनेससाठी फायदेशीर ठरतील असे निष्कर्ष काढणार्या या हुशार जमातीला "डेटा सायंटीस्ट" असे नाव आहे. मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे नुकताच वाचनात आलेला "उबर UBER" या कंपंनीबद्दलचा लेख. उबर ही कंपनी म्हणजे टॅक्सी सेवा पुरवणारे एक अप्लिकेशन आहे. थोडक्यात जरी आपल्याला उबर ही वाहतूक व्यवसायातील कंपनी वाटली तरी ती एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. तर उबरच्या प्रमुख डेटा साइंटीस्ट "कीथ चेन (Keith Chen)" यांनी नुकताच त्यांच्या ग्राहकांच्या एका विशिष्ट सवयीबद्दल खुलासा केला. उबरमध्ये "सर्ज प्रायसिंग (Surge Pricing)"हा एक प्रकार आहे. म्हणजेच जेव्हा गाड्यांची मागणी जास्त असते (ऑफीस सुरु होण्याच्या किंवा सुटण्याच्या वेळेला) तेव्हा ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागतात. बर्याचदा हे दर सामन्य दराच्या दुप्पट किंवा तिप्पट असतात. कीथ चेन यांना आढळलं की जेव्हा मोबाईलची बॅटरी संपत आलेली असते तेव्हा लोक दुप्पट , तीप्पट नव्हे तर तब्बल नऊपट पैसे दद्यायला तयार होतात. कारण मोबाईल बंद झाला तर दुसरी टॅक्सी मिळविणे जिकीरीचे जाईल हे ग्राहकांना माहित असते आणि म्हणून ते जास्तीचा दर द्यायला तयार होतात. पण हेच जर मोबाईल चार्ज असेल तर मात्र दुसरी टॅक्सी मिळेपर्यंत वाट पाहतात. आणि मुख्य म्हणजे उबरच्या अॅप मधून ग्राहकाच्या फोनमधील बॅटरीचा चार्ज किती शिल्लक आहे हे देखिल कंपनीला कळत असतं. अर्थात या माहितीचा कंपनी कधिही गैरफायदा घेत नाही असं चेन यांनी सांगीतलं. (विश्वास ठेवायचा की नाही ते सर्वांनी आपापलं ठरवावं)! अॅप इंस्टॉल करत असताना, आपल्याला बर्याच "परवानग्या" विचारल्या जातात. त्या सर्व परमिशनमधून या अॅपच्या कंपन्या काही न काही डेटा जमा करत असतात. तेव्हा या परमिशन्स देताना जरा जपूनच ! आणखी एक गोष्ट चेन यांनी सांगीतली ती म्हणजे जेव्हा "सर्ज प्रायसिंग" २ पट ( 2X )असते तेव्हा लोक टॅक्सी बुक करायला मागेपुढे पाहतात. कारण त्यांना वाटते की कंपनी सरसकट दुप्पट दर लावत आहे. पण जर दर २.१ पट ( 2.1X) असले तर मात्र लगेच टॅक्सी बुक करतात. कारण २.१ हा दर कंप्युटरने गाड्यांची उपलब्धता पाहून आपोआप ठरवला आहे असे त्यांना वाटते. आहे की नाही गंमतीशीर ! मित्रांनो यालाच म्हणतात "कंझ्युमर सायकोलॉजी". तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये "कंझ्युमर सायकोलॉजी"चा वापर करता का? तुमच्या ग्राहकाबद्द्ल इतकी बारीक सारीक माहिती मिळवता का ? मिळविली तर त्या माहितीचा व्यवसाय वाढीसाठी उपयोग करता का? धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com 'गरज ही शोधाची जननी आहे', अशी एक म्हण आहे. या उक्तीनुसारच 'रोटीमॅटीक'चा जन्म झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोल आणि चांगल्या चपात्या बनविणे, हे एका नवविवाहित तरुणीकरिता किंवा नव्याने स्वयंपाक करावयास शिकणाऱ्या कोणासाठीही अग्निपरिक्षेप्रमाणे असते. मात्र ही अग्निपरिक्षा देणे, सहजसोपे आणि सुकर झाले आहे ते 'रोटीमॅटीक' या रोबोटमुळे. झिंप्लिस्टीक निर्मित रोटीमॅटीक हा पहिला असा रोबोट आहे, जो केवळ घरगुती चवीच्या चपात्याच बनवत नाही तर अवघ्या एका सेकंदात त्या घडी करुनदेखील ठेऊ शकतो. रोटीमॅटीक या रोबोटच्या निर्मात्या असलेल्या प्रणोती नगरकर यांनी कुटुंबाला ताजे जेवण देण्यासाठी मदत म्हणून या रोबोटची निर्मिती केली. गोष्टी सहजसोप्या होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रणोती यांना लग्नानंतर कामाच्या वेळापत्रकात धावपळ होऊ लागल्याने ही कल्पना सुचली. याबाबत त्या सांगतात की, 'महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकत असताना मी शर्टांना इस्त्री करण्यासाठी स्वयंचलित इस्त्री तयार केली होती. त्यावेळेस मी चांगली संशोधक होऊन, माझ्या या संशोधनांनी इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकेन, अशी मला आशा वाटली.' प्रणोती यांना अभियांत्रिकीचा हा वारसा पिढीजातच लाभला आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रणोती या चौथ्या पिढीतील अभियंत्या असून, संशोधक होण्याचे आणि नवनवीन शोध लावण्याचे त्यांचे स्वप्न होते. आपल्या कुटुंबाबद्दल मोकळेपणाने बोलताना प्रणोती सांगतात की, 'माझे आई-वडिल दोघेजणही उद्योजक होते. माझी आई अत्यंत हुशार आणि चैतन्यदायी अशी चित्रकार. स्वतःचा इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसायदेखील तिने सुरू केला. आजच्या युगाशी बरोबरी साधण्यासाठी तिने संगणकाचे प्रशिक्षणदेखील घेतले. याशिवाय माझी आई एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. तिला आवडत असलेल्या गणित विषयाच्या ती शिकवण्या घेते. याउलट माझे वडिल. ते अगदी धाडसी, व्यवहारी, विचारी आणि तर्कनिष्ठ असे होते. मशीन निर्मिती करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. विशेष म्हणजे वयाच्या पन्नाशीत त्यांनी स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केले. माझ्यात मात्र माझ्या पालकांचे दोन्ही गुण उतरले आहेत. कला क्षेत्रातील आईचा स्वभाव थोडासा बंडखोर. मात्र वडिल तेवढेच नम्र विचारांचे आणि स्वभावाचे.' पुण्यात बालपण घालवलेल्या प्रणोती यांना महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात सिंगापूर एयरलाईन्स शिष्यवृत्तीअंतर्गत सिंगापूरला जाण्याची संधी मिळाली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचे निश्चित असल्याने त्यांनी मॅकेनिकल अभियांत्रिकी विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सिंगापूरमधील बार्कले येथील राष्ट्रीय विद्यापीठात प्रोडक्ट डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. स्टुडन्ट एक्स्चेंज कार्यक्रमांतर्गत त्या शिक्षणासाठी सिंगापूरला गेल्या होत्या. उत्पादनाच्या विस्ताराची प्रक्रिया समजण्यासाठी प्रणोती यांनी एका प्रोडक्ट डिझायनिंग कंपनीत दोन वर्षे कामाचा अनुभवदेखील घेतला. मात्र हे सर्व करत असताना प्रणोती यांच्या डोक्यात मात्र आपल्याला भविष्यात काय करायचे आहे, याचा विचार घोंगावत होता. कालांतराने प्रणोती यांचे लग्न झाले आणि त्यानंतर आजच्या युगात तरुणींना भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या समस्येवर त्यांनी मात केली. रोटीमॅटीकच्या निर्मितीबद्दल विस्तृतपणे सांगताना प्रणोती सांगतात की, '२००८ साली मी झिंप्लिस्टीकची सुरुवात केली. स्वयंचलित चपात्या बनवणारे मशीन बनवण्याचे माझे स्वप्न होते. माझी वेळ, बचत आणि मेहनत पणाला लावत मी रोटीमॅटीकची निर्मिती केली आणि माझे स्वप्न साकारले.' गेली सात वर्षापासून प्रणोती आणि टीम अथक परिश्रम घेत असून, त्यांनी सिंगापूरमध्ये एक स्पर्धादेखील जिंकली आहे. इंटेल बार्कले या इलेक्ट्रॉनिक बिझनेस चॅलेंज स्पर्धेत प्रणोती आणि त्यांच्या टीमने तिसऱे स्थान पटकावत आपली मेहनत सिद्ध केली. रोटीमॅटीक हा रोबोट मिनिटाला एक अशाप्रकारे वीस चपात्या तयार करू शकतो. चपात्यांची जाडी किंवा त्या कशाप्रकारे भाजायच्या आहेत तसेच त्यासाठी तेल किती वापरायचे आहे, हे सर्व विकल्प या रोटीमॅटीकमध्ये आहेत. २०१४ मध्ये जेव्हा त्यांनी उत्पादन बाजारात दाखल करण्यापूर्वी ग्राहकांची मागणी लक्षात घेतली तेव्हा त्यांना ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद उदंड होता. प्रणोती यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची संख्या आता वाढू लागली आहे. सुरुवातीला ती संख्या ३५ होती आणि दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. टीममध्ये योग्य आणि कुशल कर्मचाऱ्यांची निवड करणे, हे संस्थापक म्हणून प्रणोती यांच्यासमोरील मोठे आव्हान होते, असे त्या सांगतात. रोटीमॅटीकसारखे सर्वांना फायदेशीर आणि उपयोगी असे जगातील पहिले उत्पादन घडवण्यासाठी मनात चांगल्या कामाची इच्छा आणि संशोधनासाठी पूरक असे वातावरण असणे, हे सर्वात महत्वाचे असल्याचे प्रणोती सांगतात. अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे योग्य ठरते, ज्यांच्यासोबत आपण एका कुटुंबाप्रमाणे काम करू शकतो, असे प्रणोती सांगतात. सध्या त्यांच्या ग्राहकवर्गात सर्वाधिक प्रमाण हे अनिवासी भारतीयांचे आहे. विशेष करुन अमेरिकेत स्थायिक असलेली भारतीय कुटुंबे. चपाती हा भारतीयांच्या जेवणातील मुख्य पदार्थ आहे. पोटभर खाता येईल असा हा पदार्थ आहे, मात्र तो बनवण्यास सर्वाधिक कसब लागते. चपाती बनवण्याची प्रक्रिया हे वेळखाऊ असून, बऱ्याचदा भरपूर पसारादेखील होतो. त्यामुळे चपाती खायची इच्छा असूनदेखील, अनेकांना ती बनवता येत नसल्याने जेवणात चपाती नसल्याची त्यांची तक्रार असते. |