मित्रांनो, उद्योजकाचे सर्वात महत्त्वाचे शस्त्र असते त्याची मानसिकता.चौकटी पलिकडचा विचार करण्याची क्षमता ही कोणत्याही उद्योजकाची जमेची बाजू असते.
कोणत्याही व्यक्तीने व्यवसायात उतरण्यापूर्वी किंवा व्यवसाय वाढवत असताना खरच आपली "उद्योजकीय मानसिकता" परिपक्व झाली आहे का हे तपासून पाहिले पाहिजे. या महत्त्वाच्या, परंतु फारशा चर्चिल्या न जाणार्या मुद्द्यावर माहिती देण्यासाठी नेटभेटने या "फेसबुक लाईव्ह चर्चेचे" आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने बिझनेस सायकोलॉजी, सक्सेस सिस्टम, गोल सेटिंग, रिलेशनशिप मॅनेजमेंट, उद्योजकाची पर्सनॅलिटी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उद्योजकाने कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता,गरज भासल्यास चौकटिपलीकडचा विचार करणे आणि आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून कश्या प्रकारे पुढे गेले पाहिजे, याबाबत नुकतीच नेटभेट तर्फे लाइव्ह चर्चा नेटभेटच्या फेसबुक पेजवर पार पडली. नेटभेटचे संस्थापक श्री.सलील चौधरी आणि बिझनेस सायकॉलॉजिस्ट श्री. दिनेश मोरे यांच्या सोबतचे हे चर्चासत्र तुम्ही पुन्हा अनुभवू शकता.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com कोणत्याही ब्रॅण्डकर्त्यांचं स्वप्न असतं की, त्याच्या ब्रॅण्डशिवाय कोणताही अन्य पर्याय ग्राहकाला दिसूच नये; पण काहींच्या बाबतीत हे स्वप्न इतकं खरं होतं की, मूळ नाव विसरून वस्तू ब्रॅण्डचं नावच धारण करते. पेट्रोलियम जेली ही संकल्पना पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या ब्रॅण्ड वॅसलीनच्या बाबतीतही तेच घडलं. त्या ब्रॅण्डची ही कहाणी.
अमेरिकेतील ब्रुकलीन इथं राहणारे रॉबर्ट ऑगस्टस चेसेब्रू एक रसायनतज्ज्ञ होते. १८५९ चा काळ त्यांच्यासाठी थोडा कठीण होता. दिवाळखोरीला सामोरं जाणाऱ्या रॉबर्टना एका फायदेशीर व्यवसायाची गरज होती. केरोसीनचं महत्त्व त्या काळात मोठं होतं; पण पेट्रोलियमचा व्यवसायही जोर धरू लागला होता. या व्यवसायाची चाचपणी करण्यासाठी ते पेनसिल्वानिआ येथे गेले. तिथे मोठय़ा प्रमाणात खनिज तेलांचा व्यवसाय चालत असे. या भेटीच्या दरम्यान खनिज तेलाचं उत्खनन जिथे चालू होतं तिथे रॉबर्ट यांना एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट आढळली. तिथल्या ड्रिलिंग रॉडस्भोवती पेस्टसारखा दिसणारा पदार्थ चिकटलेला असायचा. रॉबर्ट यांच्यातील कुतूहल जागं झालं. त्यांनी तिथल्या कामगारांना विचारलं तर त्यांनाही फारशी माहिती नव्हती; पण त्यांच्याकडून एक महत्त्वाची गोष्ट रॉबर्टना कळली, की हे जे काही आहे, ते जखमेवर लावल्यास जखम लवकर बरी होते. रॉबर्ट यांना त्यावर अधिक संशोधन करणं गरजेचं वाटू लागलं. ब्रुकलीनना परतताना तो लोकांच्या दृष्टीने असलेला पेट्रोलियम कचरा एक किमती ऐवज घेऊन यावा तसा रॉबर्ट घरी घेऊन आले. त्या पेस्टवर त्यांनी संशोधन केलं. त्या पदार्थाचं शुद्धीकरण केलं आणि त्या पदार्थाला ‘पेट्रोलियम जेली’ असं नाव दिलं. ही प्रक्रिया अजिबातच सोपी नव्हती. एक पूर्णत: नवी गोष्ट रॉबर्ट लोकांपुढे आणत होते. त्यांनी स्वत:वरच अनेक प्रयोग करून पाहिले. स्वत:ला छोटय़ामोठय़ा जखमा करत, त्यावर ही जेली लावत जखम कोणत्याही प्रादुर्भावाशिवाय किती काळात बरी होऊ शकते, कोणत्या जखमा बऱ्या होतात, कोणत्या नाही याचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी ही जेली बाजारात विक्रीसाठी आणायचं ठरवलं. आपल्या या उत्पादनाचं नाव त्यांनी ‘वॅसलिन’ असं निश्चित केलं. या नावाबाबत दोन गोष्टी सांगितल्या जातात. एक अशी की, रॉबर्ट यांना हे नाव स्वप्नात सुचलं, तर काहींच्या मते पाण्यासाठी वापरला जाणारा जर्मन शब्द ‘वेसर’ आणि ऑलिव्ह तेलासाठी वापरला जाणारा ग्रीक शब्द ‘इलीऑन’ याच्या मिश्रणातून रॉबर्ट यांनी हा शब्द निर्माण केला. यातील दुसरी गोष्ट सयुक्तिक वाटते. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ १८७० मध्ये वॅसलिन विक्रीसाठी एक ब्रॅण्ड म्हणून सिद्ध झालं, पण लोकांना माहितीच नसणारा प्रकार विकणं आव्हानात्मक होतं. रॉबर्ट त्या काळी स्वत: छोटय़ा बरण्यांत वॅसलिन भरून एका घोडय़ाच्या बग्गीतून न्यूयॉर्कच्या रस्त्यावर वॅसलिन फुकट वाटत असतं; पण त्यांचा आग्रह होता की, याचा फायदा होतोय का नाही किंवा काही वेगळा अनुभव असल्यास मला येऊन सांगा. थंड हवेच्या प्रदेशात ही नवी जेली अनेकांना वरदान वाटली. गंमत म्हणजे रॉबर्टने फक्त कापणं, भाजण्याच्या जखमा समोर ठेवून प्रचार केला तरी लोकांनीच वॅसलिनचे अनेकविध फायदे शोधून रॉबर्टपर्यंत पोहोचवले. महिला वर्गाने कळवलं की, वॅसलिन लाकडी वस्तूंना लावलं की त्या चकचकीत होतात. शेतकऱ्यांनी आपला अनुभव सांगताना वॅसलिनमुळे शेतकी अवजारं गंजत नसल्याचं कळवलं. जलतरुणपटूंना संपूर्ण अंगाला वॅसलिन लावून पाण्यात उतरणं फायद्याचं वाटलं, स्कायडायव्हर्सना ते तोंडावर लावणं सयुक्तिक वाटलं, बेसबॉल प्लेअर ते ग्लोव्ह्जला लावत ज्यामुळे ते चामडं मऊ राहात असे. असे विविध फायदे कळत गेले. वॅसलिनला मागणी वाढली. रॉबर्टने काही विक्रेते नेमून नव्या १२ बग्गी विक्रीसाठी घेतल्या. फुकट मिळणाऱ्या वॅसलिनकरता लोक एक-एक पेनी मोजू लागले. या दरम्यान काही घटना अशा घडल्या, की महिन्याभराच्या सामानात वॅसलिन अत्यावश्यक गोष्ट म्हणून घरी येऊ लागलं. १९१२ मध्ये न्यूयॉर्क इथे इन्शुअरन्स कंपनीला लागलेल्या भयानक आगीत जखमी, भाजलेल्या मंडळींवर उपचार करताना रुग्णालयांनी वॅसलिनचा वापर केला. त्यामुळे ते ‘इस्पितळ दर्जा’चं उत्पादन मानलं जाऊ लागलं. रॉबर्ट पेरी या संशोधकाने उत्तर ध्रुव गाठल्यावर तिथे कोरडय़ा पडणाऱ्या त्वचेवर वॅसलिन कसं कामी आलं याची महती सांगितली आणि वॅसलिनमुळे त्वचा मऊ सूत राहण्याचा अनुभव घेतलेल्या राणी व्हिक्टोरियाने या बहुमूल्य संशोधनासाठी रॉबर्ट ऑगस्टस चेसेब्रू यांचा शाही सन्मान केला. या सगळ्या घटनांचा परिणाम असा झाला की, वॅसलिनची कीर्ती अतिथंड देशांत पसरत नंतर जगभरात पोहोचली. रॉबर्ट यांना ९६ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यांनी वॅसलिनची प्रगती स्वत: पाहिली. युनिलिव्हर कंपनीने हा ब्रॅण्ड विकत घेतला आहे. वॅसलिनची टॅगलाइन आहे ‘द हिलिंग पॉवर ऑफ वॅसलिन’.. दर ३९ व्या सेकंदाला जगभरात कुठे ना कुठे वॅसलिन टय़ूब विकली जाते. अजून तरी या पेट्रोलियम जेलीला कोणताही प्रतिस्पर्धी नाही. वॅसलिन एकहाती सत्ता गाजवतंय. भारतासारख्या देशात काही प्रांत वगळता कडाक्याची थंडी नसूनही घरोघरी वॅसलिन सहज आढळते. वॅसलिनची छोटय़ात छोटी डबी काढून वॅसलिनची रेघ कोरडय़ा ओठांवर फिरवणारी मंडळी तर अनेक. आज वॅसलिन अनेक रूपांत मिळतं, पण थंडीमुळे आलेला हातांचा, चेहऱ्याचा, ओठांचा कोरडेपणा पळवून लावण्याचं त्याचं कार्य तेच. डबीत असताना पांढरट रंगाची दिसणारी ती जेली त्वचेवर लागताच तैलरूपात त्वचेला जो मऊ पणा देते तो १४८ वर्षे जुना मृदू मुलायम स्पर्श हेच वॅसलिनचं यश आहे. कोरडय़ा कठोरपणाला वाकवून मृदुता जपणारा हा ब्रॅण्ड म्हणूनच विशेष ठरावा. -रश्मी वारंग. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com
तुमच्यापैकी काही जणांनी शिक्षण संपवून नुकतीच छानशी नोकरी करण्यास सुरु केली असेल किंवा काही जणांनी खूप आधीपासून नोकरीसाठी सुरुवात केली असेल. तुम्ही करिअरच्या कोणत्या टप्प्यावर आहात किंवा तुम्ही अगदी नवखे असाल तरी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. काम करताना कधीतरी असे वाटू शकते कि आपण जे काम करतोय ते आपल्यासाठी अगदीच सोप्प आहे. किंवा याच्या विरुद्धहि वाटू शकते कि आपल्याला काहीच जमत नाहीय.असे विचार निराशजनक आहेत खरे.पण अश्या विचारांना पळवून लावून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सकारात्मक कसे राहता येईल हे पाहू.
तुमच्यापैकी काही जणांनी शिक्षण संपवून नुकतीच छानशी नोकरी करण्यास सुरु केली असेल किंवा काही जणांनी खूप आधीपासून नोकरीसाठी सुरुवात केली असेल. तुम्ही करिअरच्या कोणत्या टप्प्यावर आहात किंवा तुम्ही अगदी नवखे असाल तरी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. काम करताना कधीतरी असे वाटू शकते कि आपण जे काम करतोय ते आपल्यासाठी अगदीच सोप्प आहे. किंवा याच्या विरुद्धहि वाटू शकते कि आपल्याला काहीच जमत नाहीय.असे विचार निराशजनक आहेत खरे.पण अश्या विचारांना पळवून लावून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सकारात्मक कसे राहता येईल हे पाहू. आपल्या शब्दांवर/वचनांवर वर ठाम राहणे. जर तुम्ही एखादे काम वेळेत पूर्ण करण्याचे वचन दिले असेल तर आपल्या शब्दांवर ठाम रहा आणि कामाची डेडलाइन पाळून दिलेल्या वेळेत काम पूर्ण करा.यामुळे तुमच्या क्षमतेची जाणीव तुमच्या सहकार्यांना आणि वरिष्ठांना देखील होईल.तुमच्या बद्दलचा दृष्टिकोन सकारत्मक होईल. ऑफिस मध्ये जर कोणाला तुमच्या मदतीची गरज असेल तर नक्की मदत करा.त्यामुळे तुमची विश्वासहर्ता वाढेल. तुमची एक चांगली प्रतिमा तयार होईल अश्या सकारात्मक गोष्टी तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवतील. स्वतःचे ज्ञान वाढवा कामासंदर्भातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असतेच असे नाही.ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत पण त्यांचा उपयोग आपल्याला पुढे कधीतरी होणार आहे अशा गोष्टी शिकून घेण्याकडे आपला कल असला पाहिजे.त्यामुळे आपल्या ज्ञानात भर तर पडतेच, आपला आत्मविश्वासहि नक्कीच वाढतो.वाचन,मनन तसेच इंटरनेटमुळे आपल्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी खूपसे पर्याय उपलब्ध झालेले आहेत.त्यांचा वापर करून आपण आपले ज्ञान अजून वृद्धिंगत करू शकतो. स्वतःचे प्रवक्ते स्वतःच बना. तुम्ही केलेल्या कामाचे मापन आधी स्वतः करून पहा. जर तुम्ही स्वतःच्या कामांबाबत समाधानी असाल,तर तुमच्या कामाचे श्रेय इतर कोणालाही देण्याची गरज नाही.बरेचदा काही प्रवृत्तीच्या व्यक्ती इतरांच्या कामाचे कौतुक ते स्वतःच केल्यासारखे करतात आणि स्वतःला म्हह्त्व अथवा श्रेय मिळेल या प्रयत्नात असतात. त्यामुळे अशा बाबतीत आपण केलेले काम आपणच सादर करून इतरांना स्वतःची कार्यक्षमता पटवून देणे हे देखील महत्त्वाचे ठरते. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मैत्रीपूर्ण वातावरण तुमच्या कामांचा ताण इतरांसमोर व्यक्त न करता नेहमी हसतमुख राहणे हे खरेतर खूप कठीण आहे पण एकदा हे करणे साध्य झाले तर मग तुम्ही इतरांसाठी आदरयुक्त व्यक्तिमत्त्व ठरता. तुमच्या अचिव्हमेंट्स शेअर करा. ऑफिसमध्ये लहानातले लहान यश देखील स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. आपण केलेल्या कामाबद्दल आणि मिळवलेल्या यशाबद्दल प्रामाणिकपणे वरिष्ठांशी बोलणे हेहि तितकेच महत्त्वाचे आहे.त्यामुळे तुमची कार्यक्षमता त्यांच्या लक्षात राहते आणि पुढील प्रोजेक्ट साठी ते तुमचा विचार नक्कीच करू शकतात. सपोर्ट सिस्टम तयार करणे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाला सपोर्ट करणारे सहकारीच खरतर तुमची सपोर्ट सिस्टिम असते. सहकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करणे,आपापली मते सादर करणे,इतर विषयांची चर्चा या सर्व गोष्टी एकंदरीत वातावरण हलकंफुलकं ठेवण्यास मदत करतात.त्यामुळे कामाचा ताण हलका होण्यास पर्यायाने काम उत्सहात आणि आत्मविश्वासाने पूर्ण करण्यास मदत होते.स्वतःला नेहमी समृद्ध आणि सकारात्मक सहकाऱ्यांच्या वातावरणात ठेवा. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com
Click to set custom HTML
आजचा हा लेख अशा व्यक्तीबद्दल आणि व्यवसायाबद्दल आहे ज्यांनी FMCG च्या सगळ्या नियमांना पार करून स्वतःच्या बिझनेस ला एका उंचीवर नेऊन ठेवले.या व्यक्तीने सॅशे प्रॉडक्ट पद्धत व्यवसायात आणून पारंपरिक उद्योजकतेला नवी दिशा देण्याचे काम केले.आज त्यांची कंपनी यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचली आहे.या व्यक्तीचं नाव आहे सी.के.रंगनाथन.आणि त्यांची कंपनी आहे केविनकेयर. त्यांची आतापर्यंतची वाटचाल नक्कीच सोपी नव्हती.खूप संघर्ष आणि कठोर मेहनतीने त्यांनी कंपनीला कश्या पद्धतीने आणि किती उंचीवर नेऊन ठेवले हे जाणून घेऊ. तामिळनाडूमधील एका लहानश्या खेड्यात सी.के.रंगनाथन यांचा जन्म झाला.त्यांच्या वडिलांचा शेती सोबतच एक लहानसा व्यवसाय होता.रंगनाथन यांची अभ्यासातील गती फारशी चांगली नव्हती.त्यामुळे त्यांच्या वडिलांची त्यांनी शेती किंवा बिझनेस यापैकी एक काहीतरी करावे अशी इच्छा होती.महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि घराची संपूर्ण जबाबदारी रंगनाथन यांच्यावर आली. रंगनाथन यांनी शाम्पू बनवण्याचा एक लहानसा व्यवसाय सुरु केला.वडिलांच्या नावावरून त्यांनी चिक इंडिया नावाने कंपनी सुरु केली. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ सुरुवातीला शाम्पूच्या बाटल्यांची विक्री काही खास होत नव्हती.म्हणून रंगनाथन यांनी प्रथमच शाम्पूच्या लहान पाकिटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि किंमत फक्त 1 रुपया इतकी ठेवली. शाम्पूच्या मोठ्या बाटलीच्या तुलनेत एक रुपयाचे शाम्पूचे पाकीट घेणे लोकांना परवडू लागले आणि विक्रीची हि आयडिया चिक शाम्पूच्या विक्रीसाठी अतिशय उपयुक्त ठरली. त्यांची ही कल्पना एवढी चांगली चालली की दक्षिण भारतामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर सारख्या मोठ्या कंपन्यांना देखील चिक शाम्पू ने मागे टाकले.एका लोकल ब्रँडने ग्लोबल ब्रँडवर मात करणारे हे एक चांगले उदाहरण ठरले. कमी पैशामध्ये गुणवत्तापूर्वक उत्पादनाही विक्री करून लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला.सुरुवातीला फक्त शाम्पूचे उत्पादन करणारी कंपनी हळूहळू इतरसौंदर्यप्रसाधने निर्माण करू लागली. पुढे रंगनाथन यांनी आपल्या कंपनीचे नाव केविन केयर असे ठेवले.केविन केयरचा अर्थ होतो प्राचीन सौंदर्य. नंतर रंगनाथन यांनी शाम्पूचे सुगंधी प्रकार आणि सुवासिक अत्तर यांची निर्मिती केली.सतत निरनिराळे प्रयोग करत कंपनीच्या यशाचा आलेख चढता ठेवला.नंतरहि नाईल हर्बर शाम्पू, इंडिका हेअर,नीरा हेअर वॉश पावडर तसेच अनेक सौंदर्यप्रसाधने यासारख्या उत्पदनांची निर्मितीआणि यशस्वी विक्री देखील केली.आज आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील कंपनीचे प्रॉडक्ट्स प्रसिद्ध आहेत. मित्रानो रंगनाथन यांच्या प्रवासातून आपण काही गोष्टी नक्कीच लक्षात घेऊ शकतो.आपल्या उत्पादनाविषयी नेहमी ग्राहकांच्या मनात विश्वास कायम ठेवला पाहिजे.उत्पादनाची कमी असलेली किंमत देखील व्यवसायात खूप मोठा फायदा करून देऊ शकते.आपले उत्पादन ग्राहकांच्या गरजेनुसार कसे बदलता येईल हे अभ्यासणे व्यवसाय वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com तुमच्या घरातील काही नको असलेल्या वस्तुंना तुम्ही जर कंटाळला असाल,जुनी वर्तमानपत्रे,टेलिफोन डिरेक्टरी,जुन्या वायर्स,वापरात नसलेला जुना कंप्युटर किंवा इतर इलेक्ट्रिक उपकरणे,अगदी जुने फॅशनबाह्य कपडे,खराब झालेली किंवा नको असलेली आर्टिफिशियल ज्वेलरी अशा अनेक वस्तूंचं नक्की काय करायचं हे समजत नाहीय,तर तुमच्यासाठी तुमचा रद्दीवाला अर्थात कबाडीवाला तुम्हाला नको असलेल्या वस्तू घेण्यासाठी तत्पर आहे. आजच्या डिजिटल युगात सर्व काही एका क्लिक वर उपलब्ध होत असताना कबाडीवालाही मागे राहिला नाहीय. भोपाळ स्थीत आयटी इंजिनियर अनुराग असती स्वतःदेखील अशा नको असलेल्या (ज्याला आपण ड्राय वेस्ट( dry Waist) म्हणूं शकतो) अश्या वस्तूंचं नक्की काय करायचं या विचारात होता.त्याच्या परिसरातला रद्दीवाला या सगळ्या वस्तूंचं योग्य प्रकारे वर्गीकरण करून त्याचा योग्य मोबदला देत नाही असे त्याला जाणवल्यावर तो स्वतःच या प्रश्नचं उत्तर शोधू लागला,तेव्हा त्याला कबाडीवाला एका फोन कॉल किंवा त्याहीपेक्षा ऑनलाईन बुकिंग द्वारे उपलब्ध असण्याची गरज वाटू लागली आणि त्यातूनच ‘द कबाडीवाला’ (https://www.thekabadiwala.com/ ) या घरपोच सेवा देणाऱ्या स्टार्टअप ची निर्मिती झाली. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ ‘द कबाडीवाला’ तुमच्या घरातील रद्दी किंवा टाकून दिलेल्या वस्तू फक्त घेऊन जात नाही तर त्यांचं पुनर्वापर,पुनर्प्रक्रिया,पुनर्विक्री अश्या प्रकारत वर्गीकरण करण्यास मदत करतो.त्याचा योग्य तो मोबदला देखील तुम्हाला मिळतो.यातील सगळ्यात सोपी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घरातील अडगळ, रद्दी,इ-कचरा घेऊन जाण्यासाठी तुमच्या वेळेप्रमाणे बुक करून ठेवू शकता.ग्राहकांना त्यांच्या नको असलेल्या वस्तूंच्या वजनाप्रमाणे मूल्य दिले जाते.त्यानंतर जमा केलेल्या सर्व मालाचे वर्गीकरण करण्यात येते आणि पुनर्वापर करणाऱ्या कंपन्यांना विकला जातो.यामागे साधारणतः 15 टक्के ते 40 टक्के मार्जिन ‘द कबडीवाला’ला मिळते. तसेच द कबडीवालाने स्थानिक रद्दीवाले,भंगारविक्रेते,स्क्रॅप डीलर्स यांच्यासोबत टायअप केले आहे त्यामुळे भोपाळच्या विविध भागांमध्ये पोहोचणेशक्य होते. एवढेच नव्हे तर अनेक B to B कंपन्यांसोबत देखील स्क्रॅप साठी थेट टाय अप केले आहे.केवळ एका TATA ACE सोबत सुरुवात केलेल्या या स्टार्टअप कडे आता दहा पेक्षा जास्त गाड्या आहेत आणि शंभर टन इतका माल गोळा करतात. या स्टार्टअपच्या सुरुवातीलाच वेबसाइटद्वारे दहा हजार लोकांनी या सेवेचा फायदा घेतला. तसेच अनेक मोठमोठ्या पुनर्प्रक्रिया उद्योगातील गुंतणूकदारानी या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली आहे.भोपाळमध्ये आजच्या घडीला पन्नास हजार रजिस्टर्ड यूजर्स आणि रोजचे किमान शंभर युजर्स या सेवेचा फायदा घेतात.अनुरागने त्याचं हे स्टार्टअप भोपाळ व्यतिरिक्त इंदोर,रायपूर आणि औरंगाबाद मध्ये विस्तारित केलंय. अनुरागच्या म्हणण्यानुसार त्याचं ‘द कबाडीवाला’ हे स्टार्टअप ‘गो ग्रीन’ या संकल्पनेवर आधारित काम करते. त्यामुळे नवीन यूजर्स आणि ग्राहकांना देखील याचं महत्त्व पटू लागलं आहे.पर्यावरणाची कमीत कमी हानी,वीजबचत,प्लास्टीकीचा कमीतकमी वापर याकडे ग्राहक गांभीर्याने विचार करू लागले आहेत. पारंपारिक आणि छोट्या रद्दी आणि भंगारविक्री व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध करून देणे,त्यांच्या आर्थिक संधी वाढवण्यासाठी तसेच पर्यावरण बचत यासारख्या समाजोपयोगी गोष्टी करण्यासाठी एक समान प्लॅटफॉर्म तयार करून देशातील संपूर्ण कचरा विघटन, त्याचे व्यवस्थापन करणे हे ‘द कबडीवाला’चे उद्दीष्ट आहे. मित्रांनो ,कोणताही व्यवसाय चांगलं किंवा वाईट नसतो. तसेच योग्य संधी आपल्या आसपासच उपलब्ध असते,या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण यातून शिकू शकतो. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com 1.Brand is everything
ब्रँड सगळ्यात महत्वाचा असतो, प्रॉडक्ट पेक्षा मोठा आणि कंपनी पेक्षाही मोठा. भाजपा ने भाजप सरकार बोलण्यापेक्षा, "मोदी" सरकार अशीच संकल्पना मतदारांपुढे ठेवली. कारण मोदी हा पर्सनल ब्रँड भाजपा या कंपनी पेक्षा मोठा आहे. 2.Protect your brand at all costs - काही करून ब्रँड व्हॅल्यू जपणे महत्वाचे आहे. एकदा ब्रँड खराब झाला की पुन्हा त्याला चांगलं करणं प्रचंड कठीण आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल काहीही माहीत नसलेल्यानी "पप्पू" हा शब्द लक्षात ठेवला आहे. हीच त्यांची ब्रँड इमेज त्यांना जिंकू देत नाही. 3.Do not confuse customers - आपल्या ग्राहकांना संभ्रमात ठेवू नका. पंतप्रधान कोण बनणार, हिंदुत्व, प्रखर राष्ट्राभिमान हे भाजपाचे मुद्दे मतदारांना योग्य प्रकारे माहिती करून देण्यात आले होते. याउलट काँग्रेस व इतर पक्षांनी पंतप्रधान कोण होणार हे गुलदस्त्यात ठेवले होते. कधी गरिबी, कधी शेतकरी तर कधी अल्पसंख्याक तर कधी भ्रष्टाचार असे अनेक मुद्दे त्यांनी घेतले त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. उद्योजकांनी आपल्या प्रॉडक्ट्सची असंख्य वैशिष्ट्ये दाखविण्यापेक्षा मोजक्या एक किंवा दोन महत्वाच्या ग्राहकोपयोगी वैशिष्टयांवर लक्ष केंद्रित केले पाहीजे. 4.Everybody is not your customer - समाजातील सर्व घटकांना एकत्र जिंकून घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा महत्वाच्या किंवा मोठ्या घटकांना आकर्षित करण्याची भाजपची स्ट्रॅटेजी होती. उद्योजकांनीही आपल्यासाठी योग्य मार्केट ठरवून ते डेव्हलप करण्यासाठी मेहनत केली पाहिजे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ 5.Commnunicate more and clear / talk to your customers - वेगवेगळ्या मार्गानी पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत जनतेच्या संपर्कात राहिले. जनतेला आपल्या योजनांबद्दल सतत सांगून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. जनतेलाही सरकारी कामकाजाबाबत कधी नव्हे इतकी माहिती होती. 6.Every brand needs revival - भाजपाने "मोदी" ब्रँडवर फोकस केले त्यामुळे भाजपा जिंकली याविरुद्ध कांग्रेस ने त्यांच्या "काँग्रेस" ब्रॅंडला नवे रूप दिलेच नाही. याबाबत लाईफबॉय किंवा होंडा सिटी या दोन ब्रॅन्डस कडून शिकता येईल. खूप जुने ब्रॅण्डस असूनही या दोनीही ब्रँड्सने वेळोवेळी कात टाकली आहे. सतत नव्या रूपात आणि नव्या पॅकेजिंगमध्ये दिसत असल्याने हे दोन्ही ब्रॅण्डस टिकून आहेत. 7.Customers don't buy they choose - एकवेळ तुम्ही सर्वोत्तम नसलात तरी चालेल परंतु तुम्ही इतर स्पर्धकांपेक्षा वेगळे असले पाहिजे. ग्राहक सर्वोत्तमाच्या नव्हे तर वेगळेपणाच्या शोधात असतो. मोदींनी अनेक चुका केल्या असतीलही परंतु केवळ त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांनी त्यांना पसंती दिली. उद्योजकांनीही आपल्या उत्पादन व सेवांमध्ये काय वेगळं देता येईल याचा अभ्यास केला पाहिजे. 8.Make your customers your promoters - जोपर्यंत आपले ग्राहक आपले चाहते बनणार नाहीत तोपर्यंत मोठं यश मिळणार नाही. मोदींच खरं प्रमोशन त्यांच्या चाहत्यांनीच केलं (ज्यांना भक्त म्हणून संबोधलं गेलं !) , परंतु भक्ती ही शक्ती किंवा युक्ती पेक्षा नेहमीच सरस ठरत आली आहे. उद्योजकानो , तुम्ही स्वतः किती चांगले आहात हे जगाला सांगण्यापेक्षा , तुम्ही किती चांगले आहात हे जगाला सांगणारे इतर लोक तयार करा. (मार्केटिंगच्या भाषेत त्याला social proof म्हणतात.) ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद ! सलिल सुधाकर चौधरी नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com मित्रानो,फार पूर्वीपासून ऐकत आलेली अल्लादिन आणि जिन ची गोष्ट तर तुम्हाला माहीतच आहे. अल्लादिनला जादूचा दिवा काय सापडतो,तो घासल्यावर त्यातून एक जिन काय बाहेर येतो, तो अल्लादिनच्या तीन इच्छा काय पूर्ण करतो आणि अल्लादिन अचानक श्रीमंतही होतो.गोष्ट जरी किती हि छान वाटत असली तरी त्यातली काल्पनिकता आजच्या युगात लागु होणार नाही. खरंच अश्या पद्धतीने आजच्या काळात जिन जर आपल्या इच्छा पूर्ण करायला लागला तर…? पण पुराणकाळातील जिनने आजच्या बदललेल्या युगात खरंच इच्छा पूर्ण कराव्या का?? आजच्या काळातला जिन हा त्याच्या पूर्वजांसारखा फक्त ‘हुकूम मेरे आका’ असे बोलून इच्छापूर्ती करणारा जिन नसेल. तो हि अर्थात खूप स्मार्ट झाला असेल.असे मानुयात कि तो एक आधुनिक जिन आहे. अल्लादिन ला जेव्हा तो भेटतो तेव्हा त्याच्या इच्छा पूर्ण करण्याआधी त्याबदल्यात काहीतरी अल्लादिनलाहि द्यावे लागेल अशी अट समोर ठेवतो.अर्थात झटपट इच्छापूर्तीच्या आशेने अल्लादिन त्याच्या या म्हणण्याला होकार देतो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ अल्लादिन जेव्हा त्याच्या इच्छा सांगतो कि त्याला झटपट श्रीमंत व्हायचे आहे त्यासाठी जीनकडे तो 100 मिलियन डॉलरची मागणी करतो. या पैशांच्या बदल्यात जिन अल्लादिनकडे त्याचे कान मागतो.कान जर द्यायचे आहेत तर मग अजून श्रीमंत का होऊ नये असा विचार करून अल्लादिन अजून पैशांची मागणी करतो. पण त्याबदल्यात जिन अल्लादिनचे डोळे मागतो. पुन्हा अल्लादिन विचार करतो, ‘डोळे पण द्यायचे आहेत तर मग अजून जास्त श्रीमंत होऊयात’,म्हणून मग अल्लादिन अजून पैसे मागतो आता त्याबदल्यात जिन त्याचा मेंदू मागतो.आता मात्र अल्लादिन विचारात पडतो, कि आपले कान,डोळे,मेंदू देऊन आपण जरी खूप श्रीमंत झालो तरी त्याचा खरच उपयोग आहे का?त्याला असे विचारात पडलेले पाहून जिन त्याच्या जादूच्या दिव्यात परत जाण्यास निघतो आणि अल्लादिनला म्हणतो, मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही ,कारण मला असं वाटतं कि तू आधीच खुप श्रीमंत आहेस.अल्लादिनकडे किती मौल्यवान गोष्टी आहेत याची जिन जाणीव करून देतो. आपलं हि असंच काहीसं झालं आहे.झटपट यश,पैसे कमावण्याच्या नादात आपण आपल्याजवळ असलेल्या क्षमतेचा,हुशारीचा विचारच करत नाही.किंबहुना आपल्याला याची पुसटशी जाणीवहि नसते कि आपण खरोखरंच किती श्रीमंत आहोत. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com मित्रांनो, सध्या भारतात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. आपल्या घरासाठी जशी वीज गरजेची असते तशी स्मार्टफोनसाठी इंटरनेट कनेक्शन.इतकी त्याची गरज वाढली आहे. त्यात जिओ मुळे तर डेटा पॅकसाठीची स्पर्धा अजूनच तीव्र झाली आहे. पण त्यातही एक वेगळे स्टार्टअप आपले लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे (Wifi dabba) वायफाय डब्बा.हे नाव जरी काहीसं वेगळं वाटत असलं. तरी बंगलोर मध्ये हे नवीन नाही.बंगलोर मध्ये सध्या सर्वत्र पिवळ्या रंगाचे वायफाय डब्बे दिसत आहेत. हे आपल्या नेहमीच्या वायफाय राउटर प्रमाणेच इंटरनेट कनेक्शन च काम करतात. शहरातील स्थानिक किराणा दुकाने,चहा विक्रेते आणि बेकरी अशा ठिकाणी हे वायफाय डब्बे बसवण्यात आले आहेत. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला या विक्रेत्यांकडून टोकन्स विकत घ्यावे लागतात. तुमच्या मोबाइललमध्ये विशिष्ट माहिती भरून झाली कि तुम्ही इंटरनेट वापरू शकता. यात दोन रुपये ते वीस रुपये किमतीपर्यंत टोकन्स उपलब्ध असून चोवीस तास कालावधी साठी तुम्ही इंटरनेट वापरू शकता.दोन रुपये १०० mb,१० रुपये ५०० mb आणि २० रुपए १ gb साठी असे प्लॅन्स २४ तासासाठी उपलब्ध आहेत. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ शहरातील स्थानिक किराणा दुकाने,चहा विक्रेते आणि बेकरी अशा ठिकाणी हे वायफाय डब्बे बसवण्यात आले आहेत. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला या विक्रेत्यांकडून टोकन्स विकत घ्यावे लागतात. तुमच्या मोबाइललमध्ये विशिष्ट माहिती भरून झाली कि तुम्ही इंटरनेट वापरू शकता. यात दोन रुपये ते वीस रुपये किमतीपर्यंत टोकन्स उपलब्ध असून चोवीस तास कालावधी साठी तुम्ही इंटरनेट वापरू शकता.दोन रुपये १०० mb,१० रुपये ५०० mb आणि २० रुपए १ gb साठी असे प्लॅन्स २४ तासासाठी उपलब्ध आहेत. वायफाय डब्बा या स्टार्टअप चे को फाउंडर शुभेंदु शर्मा यांच्या मते भारतात डेटा दर सध्या खूपच जास्त आहे.आम्ही किंमत आणखी कमी करूच. सध्या तरी वायफाय डब्बा हि सेवा केवळ बेंगलोर मध्येच उपलब्ध आहे,लवकरच इतर शहरांमध्ये देखील वायफाय डब्बा सुरु करण्याची योजना आहे.वायफाय डब्बा प्रसिद्ध होण्याचं कारण म्हणजे ग्राहक फक्त दोन रुपयांमध्ये चोवीस तासासाठी ऑनलाइन असू शकतो आणि हे शहरात सर्वत्र सहज उपलब्ध होऊ शकते.हि गोष्ट इतर मोठ्या कंपन्यांच्या महिन्याभराच्या कालावधीच्या डेटापॅक च्या तुलनेत बसत नसली तरी लोकांना एका दिवसासाठी सहज परवडणारी आहे. Cavin kare ne नव्वदीच्या दशकात शाम्पूच्या मोठ्या बाटलीची विक्री होत नव्हती म्हणून १ रुपयाला लहान सॅशे विक्रीसाठी बाजारात आणले.जे लोकांना परवडू लागले. किंबहुना तशीच मानसिकता तयार होऊ लागली आणि लोकांना शाम्पू ची बाटली विकत घेणे महाग वाटू लागले होते. यावरच आधारित वायफाय डब्बे काम करत आहेत आणि एकदा लोकांनी वायफाय डब्याचे दिवसभराचे डेटापॅक वापरणे सुरु केल्यानंतर ते हळू हळू मोठ्या पॅककडे वळतील,अशी या स्टार्टअप मागे स्ट्रॅटेजी आहे. या नवीन पण अनोख्या स्टार्टअप वरून एक गोष्ट नक्कीच लक्षात घेण्यासारखी आहे जरी मोठ्या कंपन्यांची स्पर्धा तीव्र असली तरी ग्राहकांना हळू हळू आपल्या प्रोडक्टची सवय करून देणे आणि तसे त्यांच्या मनावर बिंबवणे हि देखील एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे आणि भविष्यात ती नक्कीच उपयोगी पडेल. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com आपण कित्येकदा ऐकतो, “तुम्ही नवा व्यवसाय सुरु करताय? मानलं बा तुम्हाला. ” “नवीन शहरात बदली झाली आहे? अरे वाह, पण तिथली काही माहिती आहे का?” अगदी “व्यायाम सुरु करताय?” पासून ते “कॅमेरा समोर काम करताय?” पर्यंतचे असंख्य खोचक प्रश्न लोकं विचारत असतात. कधी विचार केलाय ह्याचा? कि का लोकांना असे प्रश्न पडत असतील? तुम्ही काय करताय, ह्यापेक्षा तुम्ही ते करायचे धाडस केले ही गोष्टच कित्येक जणांना न पेलणारी असते. कारण कोणतीही नवी गोष्ट करायला किंवा बदल घडवून आणायला मनात धाडस असावे लागते, आणि ते सगळ्यांना जमतेच असे नाही. धाडस म्हणजे निर्भय नव्हे. तर धाडस म्हणजे मनात भीती असून सुद्धा त्या भीतीवर मात करून काम करणे. मग ते काहीही असू शकते, जसे कि काहीतरी नवीन सुरु करायचे धाडस. चुकीचे काहीतरी होत असताना ते थांबवण्याचे धाडस. किंवा व.पु काळे म्हणतात तसं - “पोटी आहे ते ओठी आणायला सुद्धा धाडसच लागते”. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ सर्वात मोठे धाडस काय आहे माहित आहे? स्वतः जसे आहोत तसे जगणे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतः म्हणून किंवा स्वतःचे अस्तित्व जपून जगणे सोडून दिले आहे. “लोग क्या कहेंगे?” ह्या भीतीने आपण पछाडले गेलो आहोत. आपण सगळे एक खोटा मुखवटा घेऊन वावरत आहोत. ज्यात भीती आहे, संशय आहे आणि काळजी आहे. आपण धाडसाने मनाप्रमाणे जगण्याऐवजी भीती ला आपल्या मनात थारा दिला आहे. आपण कायम ह्या भीती पोटी धाडस किंवा साहस करायचे टाळतो. मित्रांनो, मी तुम्हाला आव्हान देतो- उद्यापासून आपण स्वतः म्हणून जगायचे धाडस करायचे आहे. उद्या..परवा..आणि पुढे आयुष्यभर. आपण हक्काने जगण्याचे आणि वागण्याचे धाडस करायचे आहे. आपला नवा व्यवसाय थाटण्याचे धाडस करा. पुस्तक लिहायचे, गाणे गायचे धाडस करा. स्वछंदी आयुष्य जगण्याचे धाडस करा. असे साहस करा कि आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहाल. आपल्याकडे एकच आयुष्य आहे, त्याचा पूर्ण आनंद घ्या. धाडसी होण्यासाठी आधी धाडस करणे गरजेचे आहे. “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.” तर मग तयार आहात ना? मित्रांनो, खाली कंमेंट्स मध्ये एक अशी गोष्ट लिहा जी तुम्ही इच्छा असून देखील आज पर्यंत कधी केली नाहीत, पण पुढे धाडसाने नक्की कराल. आणि आम्ही तुम्हाला ते करायला लावणारच. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com पंजाबमधील संगरूर प्रांतात नरेश गोयल यांचा जन्म झाला.लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हापासूनच अनेक कठीण प्रसंगांचा आणि अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. शिक्षण चालू असतानाच, गोयल यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या मामाच्या लहानश्या ट्रॅव्हल कंपनीमध्ये कॅशियर म्हणून काम करण्यास सुरवात केली. पुढे बी.कॉम ची पदवी पूर्ण केली आणि जनरल सेल्स एजंट म्हणून एका आंतरराष्ट्रीय एअरलाइन्समध्ये नोकरीस सुरुवात केली.या अनुभवाच्या जोरावर पुढे त्यांनी अनेक वेगवेगळ्या एअरलाईन्स मध्ये निरनिराळ्या पदावर जबाबदारीने काम पहिले. एअरलाइन्सच्या कामाचा अनुभव त्यांना अधिकाधिक समृद्ध बनवत होता.लवकरच गोयल, एअरलाइन्सच्या व्यवसायातले बारकावे शिकले आणि या क्षेत्रातील स्पर्धकांचा आणि कामाचा जवळून अनुभव त्यांना घेता आला. त्यामुळे या क्षेत्रात त्यांच्या ओळखीही वाढल्या.अर्थात याचा उपयोग त्यांना पुढे स्वतःचा बिझनेस उभारण्यासाठी नक्कीच झाला.त्यांच्या आतापर्यँतच्या एअरलाइन्समध्ये काम करण्याच्या अनुभवावरून भारताला योग्य किमतीच्या आणि योग्य वेळी योग्य आणि तत्पर सेवा पुरवेल अश्या विमानसेवेची आवश्यकता होती हे लक्षात यायला त्यांना जास्त वेळ लागला नाही. त्यांच्या या क्षेत्रातील ओळखी आणि संपर्कांच्या मदतीने; 1991 मध्ये त्यांनी जेट एअरवेज सुरू करण्यासाठी पुरेसे भांडवल उभे केले. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मैत्रीपूर्ण आणि उदारमतवादी स्वभाव असलेल्या नरेश गोयल यांनी लवकरच अनुभवाच्या जोरावर जेट एअरवेजला नावारूपाला आणले. त्याना अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले.आपल्या कर्मचा-यांचे आणि व्यवसायाशी संबंधित इतर अनेकांचे योगदान त्यांनी वेळोवेळी जाहीर करून त्याबद्दल ऋण व्यक्त केले. त्यांची जीवन गाथा भारतीय उद्योजकतेचे प्रमाण म्हणून पाहिले गेले. तरीही; बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे त्यांनी बऱ्याचदा चुकीचे निर्णय घेतले. एअरलाइन्स क्षेत्र खराब परिस्थितीतून जात होते मात्र गोयल यांना आपल्या विमानसेवेची ‘श्रीमंतांसाठीची एअरलाईन्स’ हि इमेज बदलू द्यायची नव्हती म्हणूनच जेट एअरवेज मध्ये अधिकाधिक सेवा व सुविधा पुरवल्या गेल्या परंतु प्रत्यक्षात तेवढा मोबदला मात्र मिळत नव्हता.मोठ्या प्रमाणात होणारे खर्च आणि कमी उत्पन्न यामुळे कंपनीला नुकसान सहन करावे लागत होते.काही उद्योग तज्ज्ञांच्या मते गोयल राजीनामा देतील किंवा जेटएअरवेज इतर कंपन्यांकडे सोपवतील असे वाटत होते.पण गोयल यांनी यातले काहीही न करता जेटएरवेज चालूच ठेवण्याचा मार्ग अवलंबला. त्यांच्या या धोरणामुळे त्यांचे कर्मचारी आणि भांडवलदार याबाबत अजिबातच समाधानी नव्हते आणि म्हणूनच गोयल यांचा मोठ्या प्रमाणात निषेध होऊ लागला.वाढता असंतोष आणि विरोधात जाणारी परिस्थिती यामुळे अखेरीस, नरेश गोयल यांनी कंपनीचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीने सदस्यपदाचा राजीनामा दिला.एका उत्कृष्ट नेतृत्वगुणाचा हा एक अतिशय खेदजनक अंत होता. कोणताही व्यवसाय सुरु करून तो यशस्वी करणे,ते यश पचवणे आणि त्याहून महत्तवाचे सतत मिळणारे यश टिकवणे हे किती कठीण असू शकते किंबहुना गरजेचे असते हे याद्वारे लक्षात घेता येईल.आत्मविश्वास जेव्हा गर्वात रूपांतर होतो तेव्हा त्याची मातीच होते. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com एकदा एका माणसाला भगवान बुद्धांचा अपमान करण्याची लहर आली.म्हणून तो त्यांचा सर्वांसमोर अपमान करण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ पोहोचला.त्यांच्या जवळ जाताच त्यांच्यावर ओरडू लागला, ‘तुम्हाला लोकांना शिकवण्याचा आणि ज्ञान देण्याचा काहीएक अधिकार नाही,तुम्ही खोटे आहात’. असं खूप काही अपमानास्पद बरळू लागला. इतके होऊनही भगवान बुद्धांनी मुखातून एकही अक्षर काढले नाही आणि ते स्मितहास्य करत शांत मुद्रेने स्थितप्रज्ञ राहिले. भगवान बुद्धांना शांत बसलेले पाहून तो माणूस अधिकच चिडला. आपण इतके अपशब्द बोलूनही बुद्धांना शांत पाहून त्याला कमालीचे आश्चर्य वाटले. वैतागून आणि रागानेच त्याने बुद्धांना विचारले, “मी तुमचा इतका अपमान केला, शिव्या दिल्या तरी तुम्ही माझ्यावर का चिडत नाही आहात?” ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ यावर भगवान बुद्धांनी सुरेख उत्तर दिले.ते म्हणाले, “हे भल्या माणसा मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तू एखाद्या व्यक्तीसाठी काही भेटवस्तू घेतलीस आणि त्या व्यक्तीला दिलीस,पण त्या व्यक्तीने तुझी भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला किंवा स्वीकारलीच नाही तर त्या भेट्वस्तूचं तू काय करशील?” तो माणूस भगवान बुद्धांच्या या अनपेक्षित प्रश्नाने विचारात पडला. तो म्हणाला, “ज्याअर्थी मी ती भेटवस्तू घेतली आणि समोरच्या व्यक्तीने स्वीकारण्यास नकार दिला तर ती भेटवस्तू माझ्याकडेच राहील.” यावर बुद्धांनी शांतपणे उत्तर दिले,“'त्याच प्रमाणे तू माझा अपमान करण्याच्या उद्देशाने इथे आलास,तू दिलेल्या शिव्या,अपमानास्पद शब्द मी स्वीकारले नाहीत.म्हणून ते सर्व तुझ्याकडेच राहिले. खरतरं या गोष्टीचा तुला त्रास होईल ,दुःख होईल हे मला माहित होते म्हणूनच मला तुझा राग आला नाही”. मित्रानो इतक्या सहज आणि सोप्या शब्दात मूल्यवान गोष्ट भगवान बुद्धांनी सांगितली आहे जी आपल्या रोजच्या आयुष्यात हि उपयोगी पडते. जेव्हा कोणी आपल्यावर टीका करतो,विनाकारण अपमान करतो तेव्हा त्याचा त्रास करून घेण्याऐवजी त्याचा स्वीकार न करता संयम बाळगणे हेच शहाणपणाचे ठरते.अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे केव्हाही चांगले. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com भारतीय क्रिकेट विश्वात ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, आपल्या जबाबदाऱ्या चोख पडणारा म्हणून नेहमीच नावाजला जातो. त्याच्यात असलेल्या कमालीच्या नेतृत्वगुणामुळे आंततराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचं नाव विलक्षण आदराने घेतले जाते. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळापासूनच धोनीच्या वाट्याला आलेली प्रत्येक जबाबदारी त्याने पूर्ण निष्ठेने पार पाडली . मग ते भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद किंवा यष्टीरक्षण करणं असो किंवा मग संघ अडचणीत असताना विजयासाठी दमदार खेळी खेळणं या सारख्या गोष्टी त्याने सहजरित्या हाताळल्या. परिणामी, धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले गेले. कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये आपले मानसिक संतुलन कायम ठेवत तसेच संघावर कोणतेही दडपण न येऊ देता आपल्या संघाला विजेतेपदाकडे घेऊन जाण्याचा त्याचा हाच गुण त्याला सर्वार्थाने परिपूर्ण खेळाडू बनवतो. त्याच्या अशाच आणखी एका गुणाविषयी भारतीय क्रिकेट संघाच्या माजी mental conditioning coach असणाऱ्या पॅडी अपटन यांनी आपल्या 'द बेअरफूट कोच' या पुस्तकातुन आपले विचार व्यक्त केले आहेत.धोनीचा संयम आणि शांत वृत्ती बद्दल सांगताना अपटन यांनी धोनीने संघातील खेळाडूंसाठी दिलेल्या शिक्षेबद्दलही उल्लेख केला आहे.काय होती ती शिक्षा? ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ पॅडी याबाबद्दल लिहितात, 'मी ज्यावेळी संघाशी जोडलो गेलो, तेव्हा अनिल कुंबळेकडे कसोटी संघाचं कर्णधार पद होतं, तर धोनी एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता.स्वत:च परीक्षण करण्यासाठी म्हणून संघाला विचारण्यात आलं कि सरावसामने आणि मिटिंगसाठी सर्वांनी वेळेवर येण्याची गरज आहे का? यावर सर्वांनीच होकारार्थी उत्तर दिलं. मग उशिरा येणाऱ्यासाठी काय करावं याबद्दलही चर्चा झाल्या आणि शेवटी हा निर्णय कर्णधारावरच सोपवण्यात आला '.सरावासाठी उशिरा येणाऱ्या खेळाडूने शिक्षा म्हणून १० हजार रुपयांचा दंड द्यावा असा निर्णय अनिल कुंबळेने घेतला. तर, धोनीने या शिक्षेला वेगळ्याच प्रकारे सर्वांसमोर ठेवलं.धोनीने १० हजाराचा दंड कायम तर ठेवलाच पण जर एकाही खेळाडूला उशिर झाला तरीही संपूर्ण संघातील इतर खेळाडूंनाही त्याच्या चुकीसाठी दहा हजारांचा दंड भरावा लागणार अशी शिक्षा त्याने दिली. त्या दिवसापासून एकदिवसीय क्रिकेट संघात सरावासाठी कोणताही खेळाडू उशिरा आला नाही', हा महत्त्वाचा उलगडा त्यांनी केला. संघातील खेळाडूंना वेळेचं महत्त्व कळावं म्हणून धोनीने लढवलेली ही शक्कल पाहता, त्याचं कौतुक करावं तितकं कमीच. मित्रानो team work शिकविणारा हा एक उत्तम किस्सा आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. त्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची , यश आणि अपयशाची जबाबदारी कोण्या एकाची नसून पूर्ण संघाची असते. महेंद्रसिंग धोनीची ही युक्ती खरंतर संघभावना अधिक दृढ करणारी होती आणि म्हणूनच हा मॅनेजमेंटचा एक महत्वाचा धडा आहे. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com नागपूर मध्ये स्थित श्रीकांत पंतवणे, हा एक अत्यंत गरीब घरातील मुलगा होता. त्याचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे, श्रीकांतला लहानपणी पासूनच घरात हातभार लावण्यासाठी काम करावे लागले. श्रीकांत एके ठिकाणी वितरणकर्ता (delivery boy) म्हणून काम करू लागला. नंतर तो रिक्षा चालवू लागला. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ असे म्हणतात ना कि, ‘आयुष्य एका क्षणात बदलते’, तसेच काहीसे श्रीकांत बरोबर झाले. एके दिवशी तो एक पार्सल पोहचवण्यासाठी एअरपोर्ट वर गेला असताना, त्याला तिथे काही कॅडेट्स भेटले. भारतीय वायुसेनेमध्ये प्रवेश न घेताही त्याला पायलट होता येईल असा सल्ला त्या कॅडेट्सने श्रीकांतला दिला. आणि मग काय, श्रीकांतच्याही मनात हा नवा विचार रुजू झाला. त्यांनी त्याबद्दल अजून माहिती काढली आणि डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशने (DGCA) पायलटसाठी स्कॉलरशिप सुरू केल्याची माहिती त्याला मिळाली. तो लगेच आपल्या बारावीच्या परीक्षेच्या तयारीस लागला. स्वबळावर तो बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि पुढे त्यांनी मध्य-प्रदेश मधील एका फ्लाईट स्कुल मध्ये प्रवेश घेतला. श्रीकांत फ्लाईटस्कुल मधून चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. काही दिवसांनंतर श्रीकांतची ‘इंडिगो एअरलाइन्स’ या विमान कंपनीकडून सेकंड पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली. एवढ्या परीश्रमानंतर आज श्रीकांत हवाई उड्डाण करू लागला आहे. रिक्षा ते हवाई उड्डाण असा हा श्रीकांतचा प्रवास कुणालाही थक्क करणाराच आहे. इंडिगो कंपनीला श्रीकांतच्या मेहनतीची माहिती मिळताच त्यांनी श्रीकांतचा प्रवास इंडिगोच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित केला. रिक्षा ते पायलट हा त्याचा प्रवास नुसता थक्क करणारा नसून, अनेकांसाठी तो प्रेरणादायी ठरू शकतो. स्वामी विवेकानंद म्हणतात - “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होई पर्यंत थांबू नका”. तेव्हा आपणही आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवा आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी अथक परिश्रम करा. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com -जर तुम्हाला आरामदायी आयुष्य हवे असेल….तर तुम्ही स्टार्टअप करू नका.
-जर तुम्ही सहजपणे माघार घेत असाल...तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्हाला फक्त जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी बिझनेस सुरु करायचा आहे...तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुंम्ही दिवसाचे 14 ते -16 तास काम करू शकत नसाल...तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्ही नवीन बदल स्वीकारायला आणि ते आत्मसात करायला उत्सुक नसाल आणि तुम्ही जसे आहात तसेच राहण्यात समाधान मानत असाल…तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्ही टीका सहन करायला सक्षम नसाल आणि होणाऱ्या टीकेचा त्रास करून घेत असाल…तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्ही बिझनेसमध्ये येणारे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी किंवा बिझनेस मध्ये काही ध्येय साध्य करायला कधीच उत्सुक नसाल... तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्हाला प्रत्येक महिन्यात मोठ्या सुट्टीवर जायचे असेल…तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्हाला नेहमी सुरक्षितरित्या काम करायचे असेल आणि कोणतीही जोखीम किंवा रिस्क घेण्याची इच्छा नाही...तर तुम्ही स्टार्टअप करू नका. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ -जर तुम्हाला तुमची एनर्जी आणि उत्साह जराही कमी न करता एका अपयशातुन दुसऱ्या अपयशाला सहजपणे सामोरे जाता येत नसेल ... तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्ही असा विचार करत असाल की बिझनेस फक्त फंडिंगपुरते आहे आणि आपण एकदा फंड उभा केला कि नंतर सर्व गोष्टी आपोआप होत राहतील… तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुमच्या सोबत काम करणाऱ्या लोकांशी तुम्हाला चांगलेच वागायचे आहे,जरी ते त्यांचं काम योग्य रीतीने करीत नसले तरीहि आणि ते तुम्हाला त्यांना स्पष्टपणे सांगता येत नसेल…तर तुम्ही स्टार्टअप करू नका. -जर तुम्हाला वाचन करायला आवडत नाही किंबहुना वाचन हे नवीन काहीतरी शिकण्याची आणि स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची सर्वात सोपी आणि चांगली पद्धत असताना...तर तुम्ही स्टार्टअप करू नका. जर तुम्ही योग्य संधीची वाटच बघत असाल...(अगदी काही वर्षे निघून गेल्यानंतर सुद्धा...) ...तर तुम्ही स्टार्टअप करू नका.. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com . महेंद्रसिंग धोनीने २००४ साली बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात पदार्पण केले.फलंदाजीचा क्रमांक होता 7. दुर्दैवाने त्याला पहिल्याच बॉल वर रनआऊट होऊन परतावे लागले.बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 12 रन्स केले,फलंदाजी क्रमांक 7. तिसऱ्या सामन्यात जास्त वेळ खेळता आले नाही, शेवटच्या 2 बॉल्स मध्ये 7 नाबाद धावा आणि फलंदाजी क्रमांक 7. महेंद्रसिंग धोनी 7 व्या क्रमांकला फलंदाजी ला येण्याचं कारण म्हणजे भारताची फलंदाजी ऑर्डर जी की आधीपासून फिक्स्ड होती ती म्हणजे सेहवाग, सचिन,सौरव,द्रविड,युवराज आणि कैफ. अर्थात धोनी नवीन खेळाडू होता त्यामुळे त्याला अशी तगडी बॅटिंग लाइन मोडून वरच्या क्रमांकावर खेळवणे शक्य नव्हते. कारकीर्दीच्या पहिल्या 3 मॅचेस मध्ये त्याला स्वतःला फारसे सिद्ध करता आले नाही पण तरीही त्याला पुढच्या पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी अजून एक संधी देण्यात आली.पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 7 व्या क्रमांकावर खेळत त्याने फक्त 3 रन्स केले आणि पुन्हा एकदा अपयशी ठरला. आतापर्यंतचा धोनीचा स्कोअर होता 4 मॅचेस मिळून 22 रन्स. राहुल द्रविड ने स्वतःच्या फलंदाजीच्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विकेट किपिंग करण्याची जबाबदारी आधीच सोडली होती.भारतीय टीमला एका विकेटकीपरची आणि जो चांगली बॅटिंगही करेल अशा खेळाडूची आवश्यकता होतीच.पण धोनी या दोन्ही गोष्टी करत असूनही त्याची निवड काही खास रिझल्ट्स देत नव्हती.तो टीम मध्ये असल्याने किंवा नसल्याने भारतीय टीम ला आणि प्रेक्षकांना काही खास फरक पडणार नव्हता कारण त्याची टीम मधली किंमत अजून कोणाला फारशी कळली नव्हती. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ त्याच्या अपयशाचं मुख्य कारण होतं ते म्हणजे त्याचा फलंदाजला येण्याचा नंबर -7 वा नंबर.तो अशा नंबर वर खेळत होता जिथे तुम्हाला पिच वर सेटल व्हायला फार वेळ मिळत नाही आणि त्यात तुम्हाला मोठे शॉट्स मारून जास्तीत जास्त रन्स मिळवणे गरजेचे असते.आधीचे धुरंधर फलंदाज चांगले खेळत असताना धोनीला वरच्या नंबरवर फलंदाजीला पाठवणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत सौरव गांगुली या महान लीडरने काय केले असेल? वीरेंद्र सेहवाग साठी सौरव गांगुलीने स्वतःचा बॅटिंग नंबर आधी सोडला होता हे तर सर्वज्ञात आहेच. 5 एप्रिल 2005 ला गांगुलीने पुन्हा एकदा त्याची 3 नंबरची पोझिशन धोनी साठी देऊ केली. विशाखापट्टणमच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनी तिसऱ्या स्थानावर खेळण्यास आला आणि सर्वांनाच आश्चर्य वाटलं.पण यावेळेस त्याला स्वतःला सिद्ध करायला पुरेसा वेळ आणि संधी दोन्ही गोष्टी मिळाल्या होत्या.त्याने बॉल रुपी आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं 123 बॉल्स मध्ये 148 रन्स काढत त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला होता.अर्थातच निवड समितीला पुढच्या 5 सामन्यांसाठी धोनीची निवड करण्यात काहीही संभ्रम नव्हता. त्यावेळेस सौरव गांगुलीने धोनीला तिसऱ्या नंबर वर पाठवण्याचा निर्णय का आणि कसा घेतला हे केवळ गांगुलीच सांगु शकेल पण त्याचा हा निर्णय मात्र भारतीय क्रिकेटच्या भविष्याला कलाटणी देणारा ठरला हे मात्र नक्की.एक चांगला आणि उत्तम लीडर तोच ठरतो जो फक्त त्याला फ़ॉलो करणारे सहकारी तयार करत नाही तर त्यांच्यासारखेच किंबहुना त्याच्याहुन चांगले लिडर्स तयार करतो. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com भारतात सावकारी पद्धत फार पूर्वापार चालत आलेली आहे. त्याचे फायदे आणि तोटे हे दोन्ही आपल्याला चांगलेच माहिती आहेत. कर्ज देणारे सावकार पैशाच्या जोरावर अधिकाधिक श्रीमंत होत जातात आणि जे त्यांचे कर्ज फेडू शकत नाहीत असे गरजवंत परिस्थीतिशी झुंजत राहतात. तुम्हाला जर मी खुप सारे पैसे उधार म्हणून दिले आणि तुमच्या खर्चासाठी अथवा बिझनेस उभा करण्यासाठी वापरण्यास सांगितले तर तुम्ही ते नक्कीच घ्याल आणि काही वर्षांनी ते परत करण्यास असमर्थ ठरलात तर त्या बदल्यात मी तुमचा बिझनेस माझ्या मालकीचा करून घेतला तर? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हाच आहे चायनीज मनी ट्रॅप. जगातले अनेक विकसनशील देश सध्या आर्थिक मंदीच्या तणावात आहेत . त्यांना त्यांच्या देशात अनेक विकासकामांसाठी पैसे लागतात.जसे कि रस्ते,विमानतळे,बंदरे इत्यादि. अश्या गोष्टी प्रत्येक देशाच्या विकासासाठी आणि इतर देशांशी व्यापारविनिमय करण्यासाठी या अतिशय महत्त्वाच्या असतात. चीन अश्या लहान आणि विकसनशील देशांना हेरून त्यांना बिलियन डॉलर्स मध्ये कर्ज देतो.चीन कडून कर्ज हे अर्थात जागतिक बँकेच्या नियमावलीपेक्षा कमी व्याजदाराचे असते.त्यामुळे ते गरीब देशांसाठी सोयीचे होते. एक उदाहरण पाहू,श्रीलंकेसारख्या लहान आणि विकसनशील देशाने रस्ते बांधणी,पूल,विमानतळ,बंदरे उभारण्यासाठी किंवा मोठमोठ्या उंच इमारती ज्यांना स्कायस्कीपर्स म्हणतात अश्या बांधकामासाठी चीन कडून कर्जस्वरूपात पैसे घेतले काही वर्षानंतर कर्जांची रक्कम आणि त्यावरील व्याज यांची परतफेड न करू शकल्याने त्या त्या भूभागावर आणि त्यांनी उभारलेल्या सर्व बांधकामांवर चीन ने आपला हक्क दाखवला आहे किंबहुना त्या त्या ठिकाणी आपली माणसे नेमली आहेत आणि आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. श्रीलंकेमधी;ल बंदरे आता चीन ला व्यापारासाठी फुकटात वापरता येतील. एवढच नव्हे तर युद्ध प्रसंगी श्रीलंकेमध्ये शस्त्र देखील आणता येतील. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ फक्त श्रीलंकाच नाही तर पापुआ न्यू गिनी(papua new guinea),मालदीव,पाकिस्तान,मलेशिया,लाओस,कझागिस्तान,मंगोलिया,इजिप्त,केनया, साऊथ आफ्रिका यासारखे अनेक देश चीन कडून घेतलेले कर्ज परत न केल्याने स्वतःच्याच देशात चिनी आक्रमण थांबवू शकले नाहीत.या देशातले पूल,इमारती,विमानतळे,बंदरे असे प्रकल्प सध्या चीनकडून हाताळण्यात येत आहेत.जगाच्या नकाशावर जर बारकाईने पाहिलं तर असे मोठमोठे रस्ते,पूल याद्वारे जमीन आणि बंदरे याद्वारे समुद्र मार्गे चीन आपले हातपाय पसरू पाहत आहे हे फक्त वाटतं तितकं साधासरळ नाहीय तर यातून एक खूपच महत्त्वाकांक्षी प्रकल्प समोर येतो आहे तो म्हणजे ‘न्यू सिल्क रूट’. जगभरात आधीच चिनी वस्तुंनी आपले स्थान मार्केट काबीज केले आहे आणि आता संपूर्ण जग चिनी अधिपत्याखाली येण्याच्या मार्गावर आहे. यावरून वैयक्तिक पातळीवर आपण एवढं तर नक्कीच शिकू शकतो कि अनाठायी खर्चापासून आणि कर्जापासून हि शक्य तितकं दूर राहील पाहिजे. सोर्स- नास डेली ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com आपल्याकडील शिक्षण पद्धती हि फक्त पदवी मिळवण्यासाठी उपयोगी पडते,आज बऱ्याच क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पदवी किंवा परवाना आवश्यक असतो आणि म्हणून आपण शिकतो . शाळा ,कॉलेज मधील शिक्षण हे मोठ्या प्रमाणात माणसांमधील सर्जनशीलतेला वाव देत नाही किंबहुना नवीन काहीतरी निर्माण करण्याच्या क्षमतेला,नवनवीन कल्पनांना मारक ठरते.
म्हणूनच जेव्हा आपण इतिहासात डोकावतो तेव्हा असे कितीतरी प्रतिभावान आणि खूप मोठी माणसे आपल्याला आढळतात जी त्यांच्या शालेय किंवा महाविद्यलयीन आयुष्यात अजिबातच चमकदार नव्हती किंवा बहुतेकांनी शाळा कॉलेज सोडून देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम केले आहे आणि ती आज खूप मोठी व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्यासमोर आहेत.सगळ्यात आधी आताची शिक्षण पद्धती का आणि कशी अस्तित्त्वात आली हे समजून घेऊयात. जगातील सर्वात मोठी कार कंपनी फोर्ड आणि तिला नावारूपाला आणणारा हेन्री फोर्ड.त्याने 1908 साली ‘मॉडेल टी’ हे कार मॉडेल बाजारात आणलं .अनेक दशकांपासून, जवळजवळ1972 पर्यंत मॉडेल टी हि इतिहासातील सर्वात जास्त विकली गेलेली कार होती. .मॉडेल टी बाजारात येण्याच्या आधी, कार हि एक लक्झरी वस्तू होती. 1909 मध्ये मॉडेल टी कारची किंमत 825 डॉलर होती. 1925 पर्यंत फोर्डने किंमत 265 डॉलर कमी केली. हे कसे शक्य झालं? फोर्डने गाडीचा शोध नाही लावला तर त्याने उत्पादन लाइन तयार केली जी आतापर्यंतची सर्वात परिणामकारक आणि अतिशय महत्तवाची निर्मिती प्रक्रिया ठरली.या असेम्ब्ली लाइन मॉडेलने जगाची अर्थव्यवस्था बदलवून टाकली . ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ असेम्ब्ली लाइनमुळे उत्पादनाचा वेग प्रचंड वाढला व कामगारांच्या कौशल्यांपेक्षा सांगितलेले काम करण्याच्या वृत्तीला महत्त्व प्राप्त झाले.यावर उपाय म्हणून त्यावेळच्या अशा औदयोगिक क्षेत्रातील मोठमोठ्या सम्राटांनी लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी विद्यापीठांमध्ये त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाची निर्मिती केली.याचा परिणाम असा झाला कि अशा शाळा,कॉलेजातून फक्त सांगितलेलं काम करणारे कामगार तयार होऊ लागले आणि तीच शिक्षण पद्धती आजही चालू आहे. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे कि शाळेतील बरेच ड्रॉपआउटस काही क्षेत्रांमध्ये उच्च कामगिरी कशी आणि का करतात? याचं उत्तर म्हणजे विचार करण्याचं आणि त्याप्रमाणे कृती करण्याचं स्वातंत्र्य.मनापासून एखादी गोष्ट केल्याने आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि अनुभव मौल्यवान धडे शिकवतात आणि अधिक समृद्ध बनवतात.स्वयं-शिक्षित ड्रॉपआउट्स स्वतःला काय वाटतं याचा आधी विचार करतात.एखादी समस्या सोडवण्यासाठी ठराविक साचेबद्ध सुचनांचे पालन न करता समस्या कश्या सोडवाव्या हे स्वतः विचार करतात आणि त्यातूनही शिकत राहतात. नवनवीन गोष्टी कशा तयार कराव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वेगळ्या पद्धतीने विचार कसा करावा हे शिकतात! म्हणूनच केवळ मार्क्स देणारे पदवी मिळवून देणारे शिक्षण येत्या काही वर्षांमध्ये निरुपयोगी ठरणार आहे.तेव्हा आपण शिक्षण पद्धतीत लवकरच बदल केला पाहिजे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com आय पी एल फिवर सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलाय.फायनल मॅच पण जवळ आलीय.त्यातच वल्डकप सामने पण जवळ येत आहेत.आज या जंटलमन गेमचा संबंध आपल्या आयुष्यातल्या पैशासंबधित गोष्टींशी कसा जवळचा आहे हे पाहू.तुम्हाला आश्चर्य वाटेल असे नियम आणि वैशिष्ट्ये या खेळामध्ये आहेत जी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या आर्थिक नियोजन व्यवस्थेशी मिळतीजुळती आहेत.तसेच हे नियम आपली आर्थिक गणिते सोडवण्यासाठीहि वापरली जाऊ शकतात. 1. संरक्षक सामग्रीशीवाय फील्डमध्ये पाऊल टाकू नका खेळाडूसाठी मैदानात येण्यापूर्वी जसे हेल्मेट, knee पॅड अशा गोष्टी आवश्यक असतात अन्यथा खेळाडूंना दुखापत होऊ शकते तसेच जर आपल्या आर्थिक नियोजनात संरक्षणाचा घटक नसेल तर आपल्याला बऱ्याच जोखमींना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. टीप: गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी, वित्त, जीवन आणि आरोग्याच्या जोखीमांपासून स्वतःस सुरक्षित करा. संकट समयी आवश्यक इतकी रोख रक्कम, आरोग्य विमा,जीवनविमा यासारख्या गोष्टींची तरतूद सर्वात आधी करा. 2. लांबच्या पल्ल्याचा विचार करुनच प्रत्येक कृती करा कधी कधी अति उत्साहात तर कधी दबावाखाली खेळणे हे नेहमी बऱ्याच फलंदाजांना महागात पडू शकते. गुंतवणूकदारांचे देखील सारखेच आहे, जे लवकर पैसे कमविण्याच्या नादात किंवा अति काळजीपोटी घाबरल्यामुळे नुकसान सहन करतात आणि निराश होऊन मार्केटमधून बाहेर पडतात. टीप: सुरुवातीच्या टप्प्यांत संयम आणि धैर्य असणे आवश्यक आहे. इक्विटी गुंतवणूकदारांनी दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी. 3. एका प्लेअरवर अवलंबून न राहणे एक स्टार खेळाडू कदाचित काही चांगल्या कामगिरीसह चर्चेचा विषय असू शकेल, परंतु दीर्घकाळासाठी एका खेळाडूवर अवलंबून राहणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. गुंतवणूकदारांनी फक्त नावाजलेल्या हमखास नफा देणाऱ्या कंपन्यांवर विसंबून राहू नये. टीप: तज्ञ एकाच क्षेत्रावर अवलंबून न राहण्याचा सल्ला देतात. आपली गुंतवणुक विविध क्षेत्रात आणि विविध प्रकारांत विखुरलेली (Balanced Portfolio) असेल तर मार्केटमधील बदलांचा फारसा फरक पडणार नाही. 4.चांगला संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे जसे क्रिकेट मध्ये खेळाडूंचा एकमेकांशी योग्य रीतीने संवाद साधला नाही तर फलंदाजी करणाऱ्या भागीदारांकडून खराब कॉलमुळे आऊट होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तसेच गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूकीची,आर्थिक नियोजनाची आणि विमा याबद्दल कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधने गरजेचे आहे. टीप: आपल्या कुटुंबातील सदस्यांना, विशेषतः आपल्या जोडीदाराला, गुंतवणूकीबद्दल आणि विमाबद्दल माहिती द्या. जे नॉमिनी आहेत त्यांना काय करायचे आहे ते नीट समजावून द्या. यामुळे आपण भविष्यात उपलब्ध नसतानाही कुटुंबाला आपल्या गुंतवणुकींचा फायदा मिळेल. . 5. धावफलकाकडे सतत लक्ष देणे स्लॉग ओव्हर्सलाच मोठी खेळी करणे ही विचारसरणी चुकीची आहे.सुरुवातीपासूनच रन्स बनवणे आणि योग्य वेळेपासून गुंतवणूकीचा प्रारंभ करणे केव्हाही चांगले. टीप: उशीरा प्रारंभ म्हणजे समान उद्दिष्ट मिळवण्यासाठी बरीच गुंतवणूक करणे. करिअरच्या सुरूवातीपासूनची बचत मुलांचे उच्च शिक्षण,सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य यासाठी उपयोगी पडू शकते. पहिला पगार/उत्पन्न सुरु झाल्यापासून लगेचच योग्य गुंतवणुक सुरु करा. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ 6. खेळाच्या नियमांचे योग्य रीतीने पालन करणे गैरवर्तन किंवा आक्षेपार्ह वर्तन यामुळे होणारे निलंबन हे टीमसाठी अडचणीचे ठरू शकते तसेच गुंतवणूकदाराचे अयोग्य वर्तन, अनाठायी खर्च यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. टीप: खराब क्रेडिट स्कोअर टाळण्यासाठी आपले क्रेडिट कार्ड बिले आणि कर्जाचे हप्ते नियमितपणे भरा. दंड टाळण्यासाठी वेळेवर कर परतावा करावे. 7.गुगली बॉल काळजीपूर्वक खेळणे बॅट्समन जेव्हा गुगली बॉल समजण्यास अपयशी ठरतात तेव्हा विकेट गमावतात. त्याचप्रकारे, एजंट्सकडून गुंतवणुकीचे सल्ले,टिप्स मिळवणे हे दिशाभूल करणारे असू शकते आणि यामुळे खराब गुंतवणूकचे पर्याय निवडले जाऊ शकतात. टीप: चतुर विक्रेते आपल्याला वाईट गुंतवणूक पर्याय निवडण्यासाठी गोड बोलून भाग पाडू शकतात. आर्थिक उत्पादनाच्या अंतर्गत दराची ( IRR - Internal Rate of Return) विचारणा करणे ही चुकीची गुंतवणूक टाळण्याचा एक चांगला मार्ग आहे. 8.आपली खेळी सावधपणे आणि सातत्य राखून खेळणे नियमितपणे एकेरी आणि दोन धावा घेत राहणे,मध्येच चौकार अशा पद्धतीची खेळी एक छानशी धावसंख्या उभी करण्यात मदत करतात त्याचप्रमाणे,म्युचलफंड्स मध्ये लहान पण पद्धतशीरपणे आणि नियमित गुंतवणूक (SIP)हे अत्यंत देखील फायद्याचे ठरू शकते. टीप: अल्प प्रमाणातील पण नियोजनबद्ध गुंतवणुकीसाठी प्रारंभ करू शकता आणि पुढे परिस्थिती हातात आली कि आपली गुंतवणूक वाढवू शकता. .. 9. अति सावधगिरी बाळगणे सावधगिरी म्हणून फक्त एकरी धावेवरच अवलंबून राहणे हे धोरण चांगली गुणसंख्या निर्माण करण्यास मदत करणार नाही. त्याचप्रमाणे, फक्त व्याजदराने सुरक्षित उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणे ही आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करत नाही. टीप:गुंतवणूकीचा योग्य रिटर्न मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे. इक्विटीपासून (शेअर्स, म्युट्युअल फंड्स इत्यादी) दूर जाऊ नका, विशेषत: जर आपण मुलांच्या शिक्षणासाठी, सेवानिवृत्ती इ. सारख्या दीर्घकालीन गोष्टी पूर्ण करण्यासाठी नियोजन करत असाल. १0. असंतुलित संघामुळे होणारे नुकसान खराब संघाची रचना संघाच्या एकत्रित कामगिरीवर परिणाम करू शकते किंवा हानी पोहोचवू शकते तशाच प्रकारे अनियमित मालमत्ता वाटप आपल्या पोर्टफोलिओवर परिणाम करू शकते. टीप: अधिकाधिक परतावा मिळण्याच्या आशेमुळे फक्त इक्विटीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करणे किंवा 'सुरक्षित' खेळणे आणि फक्त व्याजावर आधारित गुंतवणूक करणे यापेक्षा आपल्या वयाचा विचार करून,जोखीम घेण्याची मानसिक तयारी आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे योग्य नियोजन आपल्याला नेहमीच विजय मिळवून देऊ शकतात. ================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com खरेदीचं समीकरण सोपं करणाऱ्या ऑनलाइन खरेदीने अनेकांचे कष्ट आणि पैसा सारंच काही वाचवलं आहे. या ऑनलाइनच्या जंजाळाचे फायदे तोटे बाजूला ठेवत जर ऑनलाइन खरेदी उत्सवाचा विचार केला तर खूप साऱ्या वैविध्यासह अगणित उत्पादनांचा पर्याय देणारा ब्रॅण्ड म्हणजे अॅमेझॉन. रोजच्या आयुष्यातील आवश्यक ते चैनीच्या अनेक गोष्टी हमखास मिळण्याचं हे ठिकाण आहे. याच ब्रॅण्डची ही कहाणी. अमेरिकेतील एका मोठय़ा कंपनीत उच्चपदस्थ म्हणून काम करणाऱ्या जेफ बेझॉस यांनी मनात काही निश्चय करून १९९४ साली आपल्या पदाचा राजीनामा दिला. ई-कॉमर्सचा उत्तम अनुभव असणाऱ्या जेफ यांना इंटरनेट व्यवसायाचं महत्त्व उमगलं होतं. येत्या काही वर्षांत ई-कॉमर्समध्ये २३००% वाढ होणार ही बातमी त्यांना महत्वाची वाटली. आपलं व्यावसायिक धोरण निश्चित करत त्यांनी वॉशिंग्टन सिएटल इथे आपलं बस्तान हलवलं. ऑनलाईन कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी २० उत्पादनं निश्चित केली. त्यातली ५ त्यांना अधिक विश्वासार्ह वाटली. सीडी, कॉम्प्युटर हार्डवेअर, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, व्हिडीयोज आणि पुस्तकं. यापकी पुस्तकविक्रीच्या पर्यायासह सुरूवात करण्याचा त्यांचा निर्णय झाला. जगातील सर्वात मोठं ऑनलाइन बुक स्टोअर निर्माण करण्याचं स्वप्न उराशी बाळगून ५ जुल १९९४ मध्ये त्यांनी स्वत:ची ऑनलाइन कंपनी सुरू केली. नाव होतं केडॅबरा इन्क. वॉशिंग्टनमध्ये भाडय़ाने घेतलेल्या घराच्या गॅरेजमध्ये या व्यवसायाला सुरुवात झाली. जेफ यांच्या आई-वडिलांनी या व्यवसायाकरता जेफना अडीच लाख डॉलर्सची मदत केली. केडॅबरा इन्क नावाचं रुपांतर अॅमेझॉनमध्ये व्हायला एक घटना कारणीभूत ठरली. कंपनीच्या अगदी सुरुवातीच्या काळातच जेफ आपल्या वकिलांशी बोलत असताना केडॅबरा या नावाचा उच्चार वकिलांना नीट कळला नाही. त्यांनी ‘केडॅवर’ असा चुकीचा उल्लेख केल्यावर जेफ यांना नव्या नावाची गरज भासली. ऑनलाइन व्यवसायात नाव हे अत्यंत महत्त्वाचं असतं. नावाच्या उच्चारात संभ्रम म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहचण्यात अडथळा. नव्या नावासाठी जेफ स्वत: डिक्शनरी घेऊन बसले. त्यातून त्यांना गवसलेलं नाव म्हणजे अॅमेझॉन. हे नाव निवडण्यामागे अनेक कारणं होती. अॅमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी जी वैविध्यपूर्णतेने संपन्न आहे. ती विशालता नावात प्रतित होत होती. शिवाय आद्याक्षर ए पासून सुरू होत असल्याने ऑनलाइन कंपन्यांच्या नावाच्या यादीत ते नाव सर्वात पहिले झळकणार होतं. अशा प्रकारे केडॅबराचं रूपांतर अॅमेझॉनमध्ये झालं. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ ऑनलाइन बुक स्टोअर असणाऱ्या अॅमेझॉनचं १९९५ मध्ये विकलं गेलेलं पहिलं पुस्तक होतं, डग्लस हॉफस्टॅडटर्स यांचं फ्लुईड कंसेप्टस् अॅण्ड क्रिएटिव्ह अॅनोलॉजीज. अशाप्रकारे पुस्तक विक्रीने अॅमेझॉनची सुरुवात झाली आणि मग वेळोवेळी त्यात विविध उत्पादनांची भरच पडत गेली. कपडे,फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणकाचं सामान, गृहोपयोगी वस्तू असा विस्तार होत गेला.
नावाला जागत ऑनलाइन व्यवसायाचा हा प्रवाह खरोखरच अॅमेझॉनप्रमाणे विस्तारला. पहिल्या काही महिन्यांतच ५० राज्य आणि ४५ देशांमध्ये पसरण्याची किमया जेफच्या दूरदृष्टीने साधली. सुरुवातीच्या दोन महिन्यांत अॅमेझॉनचं आठवडी उत्पन्न वीस हजार डॉलर्स होतं. हळूहळू हा व्याप इतका वाढत गेला की अॅमेझॉन फ्रेश, अॅमेझॉन प्राईम, अॅलेक्सा, अॅमेझॉन ड्राइव्ह, अॅमेझॉन डिजीटल गेम्स ही आणि अशी अनेक उत्पादन येत गेली. ग्राहकांना त्याचा सर्वोत्तम प्रतिसाद लाभला. या सगळ्यांत जेफ यांची भूमिका महत्त्वाची आहे. हा इतका मोठा अवाढव्य पसारा सांभाळायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपल्या कामाच्या बाबतीत जराही हलगर्जीपणा जेफ यांना चालायचा नाही. ते अनेकदा कर्मचाऱ्यांना यासाठी कठोर भाषेत खडसावत असत. पण अशावेळी यासाठी बोलताना आपला तोल सुटू नये म्हणून चक्क जेफने एक प्रशिक्षक ठेवला. जेणेकरून सौम्य पण प्रभावी शब्दांत अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी काढून घेता येईल. जगभरात पसरलेल्या या लोकप्रिय ऑनलाइन कंपनीची कर्मचारी संख्या २०१७ मध्ये पाच लाख सहासष्ट हजार होती. या आकडेवारीवरून अॅमेझॉनची व्याप्ती लक्षात येते. कंपनीचा लोगो वैशिष्टय़पूर्ण आहे. जेफ यांनी शोधलेल्या नावातली गंमत वाढवत ए आणि झेड या अल्फाबेटस् खाली ओढलेला बाण ए टू झेडची खूण दर्शवतो. अॅमेझॉनवर सगळ्या गोष्टी मिळतात याचं हे प्रतिक.अॅमेझॉनची टॅग लाईन देशागणिक बदलते. “यू शॉप. अॅमेझॉन गिव्ह्ज ” या इंग्रजी टॅगलाईनसोबतच “क्या नहीं मिलेगा”? ” अॅमेझॉन है अपना दुकान” या टॅगलाईन्सही महत्त्वाच्या. सध्याच्या काळात जिथे माणसाचं ऑनलाइन आयुष्य अधिकाधिक विस्तारतंय तिथे अशा ब्रॅण्डस्मुळे कित्येक गोष्टी सोप्या होतात. आपल्या हाताच्या टिचकीवर बसल्या जागी आपले आवडीचे विविध ब्रॅण्डस् आपल्याला पहायला मिळतात. तुलना करता येते. ऑनलाइन खरेदीत मनासारखी वस्तू हाती न आल्याचे अनुभव ऐकून वाचूनही प्रत्येक दिवाळी, पाडवा, नववर्षांगणिक ऑनलाइन खरेदीची आकडेवारी वाढतेच आहे. या वाढत्या खरेदीत २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत ब्रॅण्ड अॅमेझॉन महत्त्वाचा आहे. कारण त्या नदीच्या नावातले सातत्य, विशालता, वैविध्य या ब्रॅण्डने जपले आहे. - रश्मी वारंग ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com मित्रांनो, आपल्या सर्वाना सहा ज्ञान इंद्रियांबद्दल तर माहित आहेच,या इन्द्रियांपैकी
सर्वात वरचं किंवा महत्त्वाचं इंद्रिय कोणतं असा प्रश्न विचारला तर उत्तर देणं कठीण असेल.कल्पना करा यापैकी डोळ्यांनी काम करणे बंद केले तर? अचानक काही काळासाठी आपली बघण्याची क्षमता काढून घेतली तर?आणि ते हि समोर स्वादिष्ट असे जेवण असताना? डोळ्यांसमोर फक्त गडद अंधार! या अंधारात ही तुम्हाला सामोर असलेल्या जेवणाचा आस्वाद फक्त अंदाजाने आस्वाद घ्यायचाय! आहे ना विलक्षण आणि वेगळा अनुभव? होय! असा अनुभव तुम्हाला मिळू शकतो 'डायलॉगस इन द डार्क' (Dialogues in the Dark) या रेस्टारंट मध्ये.तुम्ही जेव्हा या रेस्टॉरंट मध्ये जाता तेव्हा तुम्हाला तुमच्याकडच्या लाइट असलेल्या किंवा प्रकाशित होणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे मोबाईल, घड्याळ, लाईटर इ. सगळं काही एका लॉकर मध्ये ठेवायला सांगतात,अगदी तुमच्या चष्म्या सकट.तुम्ही आत प्रवेश केल्यानंतर लगेचच दरवाजा बंद केला जातो. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मित्रांनो,जर मी तुम्हाला असे सांगितलले की तुमच्या डोळ्यावर मी एक कापडी पट्टी बांधणार आहे तर तुम्ही थोडे का होईना स्वतःला सावराल कारण असे केल्यावरही तुमच्या डोळ्यांना आजूबाजूचा प्रकाश जाणवेल, पण या रेस्टॉरंट मध्ये अतिशय गडद अंधार असतो. आत गेल्यावर आपले जर सोबती असतील तर आपल्याला एकामागे एक अशी साखळी करण्यास सांगतात आणि अशी साखळी करून आतला एक आपला वेटर मित्र आपल्याला आपल्या जेवणाच्या टेबलपर्यंत घेऊन जातो व आपल्या जागेवर बसण्यास मदत करतो. हे सगळं होत असताना आपले निरागस डोळे कुठूनतरी एखाद्या प्रकाशाची ज्योत येईल का ह्याची केविलवाणी आशा करत असतात पण तसे अजिबातच होत नाही.नंतर एक वेटर आपल्या जवळ येऊन आपल्याला पाण्याचा ग्लास पुढे करतो व तो कुठे ठेवला आहे त्याचा अंदाज देतो. मागाहून आपलं जेवणही येत. आता एक अंदाज लावा की तुम्हाला तुमचे जेवण जेवायचे आहे तेही समोर वाढलेल्या ताटाचा फक्त अंदाज घेऊन!! इथे वाढणारे वेटर्स हे इतक्या अंधारातही इतके सराईतपणे सर्व कामे करतात हे पाहून आश्चर्य नक्कीच वाटते पण त्याहून मोठा धक्का बसतो जेव्हा तुम्हाला हे कळतं कि आपल्याला कि आत घेऊन जाणारा आपला मित्र, वाढणारे वेटर्स हे अंध आहेत. इथून जेवून बाहेर पडलेल्यांसाठी हा एक वेगळा आणि विलक्षण अनुभव असतो यात शंका नाही.हे रेस्टारंट संवेदनशील व्यक्तींना अंध व्यक्तींच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचं आणि अनुभवांचं थोड्या काळासाठी दर्शन घडवतं.अशा पद्धतीचं रेस्टारंट सुरु करण्यामागे हीच सामाजिक भावना आहे कि एखाद्या व्यक्तीच्या अपंगत्वावर सहानुभूती दाखवण्यापेक्षाही,त्यांचं आयुष्य जगण्याचा छोटासा प्रयत्न देखील तुमचे विचार पूर्णपणे बदलून टाकतात आणि आपण एका वेगळ्याच उंचीवर जातो. मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण "मिरची अँड माईम" या अनोख्या हॉटेलबद्दल माहिती घेतली. (त्यबद्दल इथे वाचा - https://www.netbhet.com/blog/mirchi-and-mime-a-special-restaurant-and-amazing-business ) आणि आज ‘डायलॉगस इन द डार्क’ बद्दल ! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com
सध्या भारतात अनेक स्टार्टअप निर्माण होत आहेत जे काही खास दृष्टिकोनातून आणि काही विशेष उद्दीष्ट समोर ठेवून बनवले जात आहेत.
’द अशिओतो (Ashioto) क्राउड अनॅलिटीक्स’ हे स्टार्टअप देखील एक असे उदाहरण आहे कि जे खास 2015 मध्ये झालेल्या नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये होणाऱ्या गर्दीसाठी बनवल गेलं. अशिओटो (Ashioto) म्हणजे जपानी भाषेत ‘पाऊल’.हि एक अशी खास मॅट (चटई) आहे जी एखाद्या ठिकाणी होणारी गर्दीची माहिती तिच्यामध्ये असलेल्या सेन्सर्स द्वारे एकत्रित करून गर्दीच व्यवस्थापन करण्यास मदत करते. 2015 मध्ये कुंभ मेळा हा पहिला कुंभ मेला होता ज्यात शून्य मनुष्यहानी झाली. याचे श्रेय जाते ते अतिशय तरुण अशा निलय कुलकर्णी आणि त्याच्या टीमला.मूळचा नाशिकचाच असणारा नीलय लहानपणापासूनच त्याच्या आजोबांकडून कुंभमेळा,त्यात होणारी गर्दी तसेच चेंगराचेंगरी याबद्दल ऐकत होता. 2013 च्या कुंभमेळ्यामध्ये जेव्हा 42 जण मृत्यूमुखी पडले आणि किमान 45 जण जखमी झाले तेव्हा मात्र यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी त्याने स्वतःला असलेल्या प्रोग्रामिंगचे ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेद्वारे या संकटावर मार्ग शोधण्याचा विचार केला आणि दरवर्षी होणाऱ्या भयानक मृत्यूचे निराकरण करण्याचे ठरवले.त्यावेळी तो अवघ्या पंधरा वर्षांचा होता. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ त्याने बनवलेली हि mat अतिशय वैशिट्यपूर्ण आहे.सेन्सर्स बसवलेल्या या मॅट्स कुंभमेळ्यात ठिकठिकाणी ठेवण्यात आल्या. मॅट्स वर पडणाऱ्या पावलांचे सॉफ्टवेअर द्वारे संकलन करण्यात आले.अश्या रीतीने एखाद्या पॉईंट वर होणाऱ्या गर्दीचे मोजमाप करून गर्दीची माहिती पोलिसांना देण्यात आली.यामुळे गर्दीचे योग्य पद्धतीने निवारण करणे आणि चेंगराचेंगरी सारख्या समस्येवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले. अवघ्या अठरा वर्षाचा निलय त्याच्या स्टार्ट अप बिझनेसचा सॉफ्टवेअर प्रमुख म्हणून काम पाहतो. त्याच्या मते उद्योजक हा लोकांच्या समस्येवर विचार करून त्या आपल्या उद्योगातून सोडवण्याचा विचार करणारा असतो.दीर्घकाळ चालणाऱ्या व्यवसायाची उभारणी करणे तो व्यवसाय टिकवणे ही एक अशी गोष्ट आहे जी लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आणि तुमच्या उद्योगाबद्दल विश्वास तयार करण्यास मदत करते तसेच आज जे विद्यार्थी स्वतःच स्टार्टअप सुरू करण्याच्या दुविधेमध्ये आहेत त्यांनी आपल्या वयाचा विचार न करता नवीन निर्मिती सुरु ठेवावी,असे निलय कुलकर्णी त्याच्या tedtalk मध्ये या स्टार्टअप बद्दल बोलताना म्हणतो. (त्याचा व्हिडीओ ब्लॉग वर बघण्यासाठी क्लीक करा) ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com तुम्ही कधी तुमचे इअरफोन्स किंवा चार्जर घरी विसरला आहात आणि तुम्हाला ते हवेच आहेत.
तुम्हाला एका खास दुकानातून काही सामान विकत घ्यायचीय? एखाद्या दूरच्या हॉटेल मधून तुमची आवडती डिश ऑर्डर करायचीय? किंवा एखादे महत्त्वाचे पेपर्स झेरॉक्स करायचे आहेत?पण वेळ मिळत नाहीय? मित्रानो अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत पण वेळ नाहीय. अशा सर्व लहानातल्या लहान अथवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी तुम्ही सहज करू शकता Dunzo app वापरून.हे अॅप सुरु करण्याचं मुळात हेच उद्दिष्ट होत कि जी कामे तुमच्या लिस्टमध्ये आहेत पण ती पूर्ण होत नाहीत अशा गोष्टी तुम्ही Dunzo app वापरून करू शकाल. खरंतर Dunzo app चे सी इ ओ कबीर विश्वास यांची हि एक साधी कल्पना होती कि त्यांना जी कामे करायला वेळ मिळत नाहीय किंवा आवडत नाहीत अशी कामे करून देणारी काहीतरी सर्व्हिस असायला हवी. म्हणून त्यांनी आधी हि कल्पना व्हॉटस ग्रुप वर करून पहिली. त्यांनी ग्रुप वरील मेम्बर्सची पेंडिंग कामे करून देण्यास सुरुवात केली. यातून बऱ्याचश्या गोष्टी त्याना अभ्यासता आल्या जसे कि नक्की कशा प्रकारची कामे,मग त्यांचे वर्गीकरण मग त्यासाठी इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांशी सांगड कशी घालता येईल अशा प्रकारे अनेक प्रश्नोत्तरातून अखेरीस डंझो अॅपची निर्मिती झाली.गमतीची गोष्ट अशी आहे कि याआप साठी चे गुंतवणूकदार देखल कबीर यांना या व्हॉटस ग्रुप द्वारेच मिळाले. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ Dunzo आपल्या शहरामध्ये काहीही वितरीत करतो,आपले आवडते पिझ्झा किंवा बर्गर, फार्मसी, किराणा, कपडे धुण्याचे यंत्र, पाळीव प्राणी , पुस्तके, आपला फोन किंवा इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू या सारख्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपण डंझोअॅप द्वारे मागवू शकतो.किंवा इतर कोणाला पाठवू हि शकतो. याव्यतिरिक्त आपण जर का आपल्या घरी काही वस्तू विसरलो असू तर त्या सुद्धा Dunzo आपल्याला आणून देतो.फळे,भाज्या एवढंच काय किराणा खरेदी देखील करू शकतो. या मागे खूप सारा अभ्यास आणि अतिशय कणखर असे मॅनॅजमेन्ट जे कि तुम्हाला हे आप वारंवार वापरण्यास प्रवृत्त करते. जुलै २०१५ मध्ये विकसित झालेल्या या Dunzo app ची सेवा सध्या बंगलोर, पुणे, गुडगाव, दिल्ली, नोएडा, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांमध्ये 24x7 उपलब्ध आहे.अशा या सर्व प्रकारच्या ऑन डिमांड सेवा पुरवणाऱ्या आप मध्ये नुकतीच गुगल ने थेट गुंतवणूक केली आहे.चार वर्षात एका व्हॉटस ग्रुपने सुरु होऊन एका २१० करोड गुंतवणूक असणाऱ्या यशस्वी स्टार्टअप ची ही गोष्ट. अश्या प्रकारच्या स्टार्टअप्स ना Hyper locals business म्हंटले जाते.छोट्या कार्यक्षेत्रांमध्ये सेवा देणे हे अनेक मोठ्या कंपन्यांना शक्य होत नाही त्यामुळे नविन व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वाना hyper local business ही सुवर्णसंधीच आहे.व्हाट्सअप्प सारख्या सेवेचा वापर करून तुम्हालाही असाच एखादा सर्विस बिझनेस सुरू करता येईल त्यासाठी गुंतवणुकीची ही अजिबात गरज नाही.बघा तर मग तुम्हालाही काही सुचतं का! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! Netbhet.com मित्रांनो, तुम्ही हॉटेल मध्ये जाता का?
मग तुम्हाला हे माहीतच असेल कि कुठल्याही हॉटेल मध्ये जाऊन वेटरला मेनू विचारला, कि तो भली मोठी नावांची यादीच सांगतो, किंवा शे-दोनशे मेनू असलेले मेनूकार्ड आपल्या पुढ्यात आणून ठेवतो. पण मुंबई मधल्या एका हॉटेल मधले चित्र थोडे वेगळे आहे. पवई हिरानंदानी बिझनेस पार्क मध्ये स्थित "मिरची अँड माईम" हॉटेलची खासियत काही औरच आहे. येथे सांकेतिक खाणा-खुणांच्या द्वारे तुमची ऑर्डर विचारली जाते. आणि तुम्हीही सांकेतिक भाषेत पदार्थ सांगायचा असतो. कारण "मिरची अँड माईम" मध्ये काम करणारे कर्मचारी हे मूकबधिर आणि कर्णबधिर आहेत. मिरची अँड माईम मध्ये भारतीय पद्धतीचे जेवण मिळते. मिरची हे भारतीय जेवणातील महत्वाचे घटक आहे, आणि इथे प्रत्येक गोष्ट मूकअभिनय (MIME) करून दाखवावी लागते, त्यामुळे ह्या हॉटेलचे नाव मिरची अँड माईम ठेवले आहे. त्यांच्या मेनू कार्डवर सांकेतिक भाषेच्या सूचना आहे. त्यानुसार मूकअभिनय करून तुम्ही हवे ते अन्न मागवू शकता. हॉटेलचे बुकिंग सहजासहजी मिळत नाही, इतके लोकांच्या पसंतीस उतरले आहे हे हॉटेल. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ समाजासाठी काहीतरी करावे ह्या उद्देशाने प्रशांत इस्सर आणि अनुज शाह या मध्यमवयीन गृहस्थांनी हे हॉटेल सुरु कले आहे. 'आमच्याकडे असलेल्या कर्मचाऱ्यांसारख्या आणखी लोकांना भविष्यात हॉस्पिटॅलिटी उद्योगात स्थान मिळावं. एकटा-दुकटा नव्हे तर संपूर्ण टीम याच लोकांची असावी, हे आमचं ध्येय असल्याचंही त्यांनी सांगितलं.अशा कर्मचाऱ्यांना घेऊन हॉटेल सुरू करणं हे एक आव्हान होतं. हॉटेलमध्ये काम करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या आई-वडिलांना विश्वासात घ्यावं लागणार होतं. त्यासाठी प्रशांत व अनुज यांनी अनेक संस्थांची मदत घेतली आणि अखेर एक स्वप्न प्रत्यक्षात आलं. 'कोणाचीही सहानुभूती वा शाबासकी मिळवण्यासाठी आम्ही हे हॉटेल उघडलेलं नाही. मूक व्यक्ती आदरातिथ्याचं काम जितकं चांगलं करू शकते, तितकं नॉर्मल व्यक्तीही करू शकत नाही, असा आमचा विश्वास आहे. तो सार्थही ठरला आहे. ग्राहक आमच्यावर प्रचंड खूष आहेत,' असं प्रशांत यांनी सांगितलं. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ मिरची अँड माईम म्हणजे -स्वादिष्ठ अन्न, उत्तम वातावरण आणि मूकबधिर आणि कर्णबधिर व्यक्तींना मदत करणारी एक अनोखी व्यावसायिक संकल्पना. (शेवटचा मुद्दा भारतात खूप कमी आढळतो). समाजाचे आपण काही देणे लागतो ह्या विचारानेच अशा अनोख्या व्यावसायिक संकल्पना जन्माला येतात. मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण "सेवा कॅफे" या अनोख्या हॉटेलबद्दल माहिती घेतली. (त्यबद्दल इथे वाचा - https://www.netbhet.com/blog/seva-cafe ) आणि आज "मिरची अँड माईम" बद्दल ! या दोनीही हॉटेल्सने बिझनेस मध्ये नाविन्यपूर्ण कल्पना राबविल्या. केवळ जेवणाची चव, किंमत किंवा हॉटेलचे इंटीरीअर या नेहमीच्या गोष्टींपेक्षा ग्राहकाला एक अनपेक्षीत अनुभव देण्यात ही दोन्हीही हॉटेल्स यशस्वी झाली आहेत. आपणही आपल्या बिझनेस मध्ये ग्राहकांना असे "अनुभव" देण्यावर भर देतो का ? ग्राहक बाहेर जाऊन आपल्या बद्दल इतरांशी बोलतील असे काही मुद्दे आपल्या बिझनेसमध्ये आणू शकतो का याचा विचार करा आणि ते अमलात आणा ! त्यानंतर पहा ग्राहकच आपली मार्केटिंग करु लागेल्...आणि आपोआप व्यवसाय वाढू लागेल ! स्टीव्ह जॉब्ज आपल्याला आधीच सांगून गेला आहे " Think Different" ! ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! https://www.netbhet.comhere to edit. आपलं मन जे विचार करतं आणि ज्यावर विश्वास ठेवतं ते साध्य होतेच.
मित्रानो आज डिजिटल आणि सोशल मीडियामुळे फक्त एखाद्याचे व्यक्तिगत आयुष्यच नव्हे तर एखाद्या देशाचे राजकीय भविष्य देखील किती मोठ्या प्रमाणात बदलू शकते याची कल्पना आजचा हा लेख वाचल्यावर तुम्हाला येईल. युक्रेन या देशामध्ये रविवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. एक विनोदी अभिनेता वोलोडायमिर झेलेन्स्की(वय 41) हे 73%मतांनी विजयी झाले आहेत.आश्चर्याची गोष्ट हि आहे कि झेलेन्स्की यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते तर त्यांनी ‘सर्व्हन्ट ऑफ द पीपल’ या टीवी मालिकेत ‘वासिल होलोबोरोड्को’ नावाच्या शिक्षकाची भूमिका साकारली होती,जो भ्रष्टाचाराविरुद्ध भाषण करतो.या शिक्षकाचे हे भाषण मालिकेमध्येच सोशल मिडियावर व्हायरल होते आणि ते मालिकेमध्येच देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. या टीव्ही शोमुळे वर्तमान सरकार आणि त्याचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को यांविरुद्ध असंतोष वाढू लागला. साहजिकच ‘सर्व्हन्ट ऑफ द पीपल’ या मालिकेच्या लोकप्रियेत वाढ झाली. पुढे या टीव्ही शो मध्ये झेलेन्स्की यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा दिलेला दाखवला आहे त्यामुळे त्यांची तशी प्रतिमा होत गेली. गेल्यावर्षीच निवडणूकपूर्व चाचणी मध्ये झेलेन्स्की हे सर्वाधिक मतांनी निवडून येणार असे आढळले होते. पण गमतीची गोष्ट म्हणजे त्यावेळेस ते निवडणुकीसाठी उभे देखील राहिले नव्हते.त्यांना मत देणे म्हणजे विद्यमान सरकारचा धिक्कार करणारे मत(जसे आपल्याकडे NOTA हा पर्याय असतो.)असे मानून लोकांनी त्यांना भरघोस मते दिली आणि खरोखरच ते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ टीव्ही शो सारखच त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव देखील तेच होते ‘सर्व्हन्ट फॉर द पीपल’. आणि त्याचा मुख्य फोकस हा टीव्ही मालिकेसारखाच भ्रष्टाचाराला विरोध हाच होता. निवडणुकीआधी त्यांनी एकही टीव्ही मुलाखत दिली नाही आणि तत्कालीन राष्टध्यक्षांसोबत कोणताही वादविवाद केला नाही.पारंपरिक राजकीय प्रचार न करता त्यांनी स्टेज शोज केले ज्यामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढा कसा देणार याचे नाट्य रूपांतर दाखवले जायचे. हि अनोखी कल्पना जनतेला खूपच आवडली. त्यांच्या राजकीय अजेंड्याबद्दल फक्त YouTube आणि Instagram वर पोस्ट केले गेले. खरंतर याची सुरुवात एक विनोद म्हणून झाली होती.पण बघता बघता सर्व राजकारण्यांना धक्का देणारा निर्णय जनतेने दिला.१०० वर्षांपूर्वी नेपोलियन हिल यांनी अनेक यशस्वी लोकांचा अभ्यास करून यशाचे रहस्य नेमके कशात असते ते सांगितले होते त्याला द कार्नेगी सिक्रेट (The Carnegie Secret)म्हणतात जे एका वाक्यात सांगायचं तर असं आहे कि ‘आपलं मन जे विचार करतं आणि ज्यावर विश्वास ठेवतं ते साध्य होतेच.’ आज, सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने कमीतकमीवेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि गोष्टी व्हायरल होणे खूप सोपे झाले आहे त्यामुळे कोणतेही अशक्य वाटणारे स्वप्न खऱ्याखुऱ्या आयुष्यात जगणेही शक्य नक्कीच झाले आहे.व्होडायमीर झेलेंस्की यांना जिंकल्यानंतर कसे वाटले असे विचारल्यावर त्यांचे उत्तर होते,"एक युक्रेनियन नागरिक म्हणून मी सर्व जगाला सांगू शकतो, या जगात सर्व काही शक्य आहे. ================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com खेळणी, वाहनांचे सुटे भाग अश्या गोष्टी बनविण्यासाठी आतापर्यंत ‘३डी प्रिन्टर’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत होता. नाक-कानासारखे अवयव तयार करण्यासाठीही अलिकडे त्याचा उपयोग होऊ लागला आहे.
मात्र इस्रायलमधील तेलअवीव विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी त्याच्याही पुढे जाऊन, या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी पेशी आणि रक्तवाहिन्या वापरून चक्क हृदयाची निर्मिती केली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे जगभरातील वैद्यकशास्त्राला नवी दिशा आणि नवीन आव्हाने मिळणार आहेत . . हे संशोधन यशस्वी करणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ.ताल डवीर यांच्या म्हणण्यानुसार, आजवर ३डी प्रिंटरच्या साहाय्याने अनेकांनी हृदयाच्या प्रतिकृती बनविल्या आहेत. पण प्रत्यक्ष मानवी पेशी, रक्तवाहिन्या, कप्पे आदी असलेले हे हृदय पहिल्यांदाच बनविण्यात आले आहे. वैज्ञानिकांनी अखेरीस जगातील पहिले 3D प्रिंटेड हृदय बनविण्यात यश मिळविले आहे. हे हृदय आकाराने छोटे असले तरीही ते पूर्णपणे मानवाच्या हृदयाप्रमाणेच बनविण्यात आले असून त्याचप्रमाणे कामही करते. या प्रिंटेड हृदयात मानवी हृदयासारखे कप्पे, रक्तवाहिन्या बनविण्यात आल्या आहेत.हे हृदय रुग्णाच्या पेशींपासून बनविण्याचे मुख्य कारण म्हणजे मानवी शरीर या हृदयाला प्रतिसाद देईल.या शोधामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा असा कि यापुढे तातडीने गरज भासल्यास अवयव दात्याची बराच काळ वाट पाहावी लागणार नाही.या हृदयामध्ये सेल्स म्हणजेच पेशींचे रोपण केल्यावर ते लगेचच रक्त ढकलण्यास सुरुवात करते. भविष्यात यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचतील. =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR =================== खरंतर काही देशांमध्ये आपल्या शरीराचे भाग आधीपासूनच 3D प्रिंट होत आहेत, फिनलंडच्या टँपेर विद्यापीठात मानवी डोळ्यांचा एक नाजूक भाग ‘कॉर्नियास’ ३D प्रिंट होत आहे ज्यामुळे अंधत्वावर उपचार केले जात आहेत.चीनने देखील मानवी पोटाचे यशस्वीपणे 3D प्रिंट केले आहे. ऑस्ट्रेलियन रूबेन लिटर हि व्यक्ती 3 डी प्रिंटेड पायचे हाड मिळवणारा जगातील पहिली व्यक्ती होती तसेच डेंटल इम्प्लांट आणि हाडे बदलण्यामध्ये 3 डी प्रिंटिंग मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. स्वीडनमध्ये रूग्णांच्या स्वतःच्या पेशी वापरुन 3 डी प्रिंटेड त्वचा, नाक आणि कान देखील बनवले गेले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून इटलीमध्ये 3 डी प्रिंटिंग केस बनवले गेले आहेत आणि त्याद्वारे पूर्ण केस प्रत्यारोपण केले जात आहेत. येत्या दशकात, सर्वच मोठ्या हॉस्पिटलमध्ये अवयव प्रिंटर उपलब्ध असतील अशी या टीमची अपेक्षा आहे.तसेच प्रिंट करण्यायोग्य अवयव तयार करण्याचे प्रमाणही येणाऱ्या दशकात खूप वाढलेले असेल. आपण आपल्या शरीरातील बऱ्याच अवयवांमध्ये हवे ते बदल करू शकतो इतके तंत्रज्ञान वेगाने विकसित होईल. सध्या आपण एका नवीन युगाच्या उंबरठ्यावर आहोत, जिथे आपण मानव म्हणून काय विचार करतो,कृती करतो हे खूप महत्तवाचे असेल कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थ केवळ स्मार्ट रोबोट नसून कृत्रिम मनुष्य देखील असू शकतो. याबद्दल आपल्याला नक्की काय वाटतं? ही चांगली गोष्ट आहे का? कि तंत्रज्ञानाचा तोटा आहे? किंवा दोन्ही? =================== नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! www.netbhet.com |